Breaking News

मंगळवेढा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मंगळवेढा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ फेब्रुवारी २०२५

मंगळवेढा जी.सोलापूर या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 ( ॲट्रोसीटी ) जाणीव जागृती व जातीय सलोखा कार्यशाळा संपन्न झाली.


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

या कार्यशाळेला उपविभागिय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, दक्षता कमिटीचे सदस्य तथा निमंत्रित सदस्य  व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक तरुण तडफदार युवा नेतृत्त्व तथा ऍड.रोहित एकमल्ली यांनी जोरदार आक्रमक भाषा शैलीत सर्वांना मार्गदर्शन केले.

एडवोकेट रोहित एकमल्ली यांनी ॲट्रॉसिटी कायद्यातील प्रमुख तरतुदी कलम निहाय माहिती देताना ॲट्रॉसिटी चा तपास करताना घ्यावयाची काळजी, तपासातील त्रुटी, पोलीस पाटील, ग्रामसेवक,तलाठी यांच्या जबाबदाऱ्या, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची कायदा वस्तू व्यवस्था राखण्यासंदर्भात कर्तव्य जबाबदाऱ्या, प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची कार्य या विषयांवर सखोल मार्गदर्शन करत असताना फिर्यादी व साक्षीदारांच्या अधिकार व तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताना येणाऱ्या अडचणी याबाबतीत त उपस्थित पोलीस यंत्रणा तहसीलदार प्रांत यांना मार्गदर्शन केले.

दक्षता कमिटीचे सदस्य अविनाश ताकतोडे  यांनीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारांना सन्मानाचे वागणे द्यावी. तात्काळ तक्रार दाखल करून घ्यावी. दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे घ्याव्यात म्हणून मार्गदर्शन केले.

पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा आणी महत्वाचा कणा आहे. त्यांनी गावस्तरावर ज्या  ताण तणावाच्या घटना घडण्याच्या शक्यता वाटते  त्या पुढील अधिकाऱ्यास कळवल्या पाहिजेत. अन्यथा ताण-तणावाची माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवरती ग्रह विभागाच्या शासन निर्णयानुसार निलंबनाची कारवाई करावी अशी ही मागणी सदस्य अविनाश ताकतोडे यांनी केली.

 समितीचे सदस्य परमेश्वर गेजगे यांनी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची उपयुक्तता व पोलिसांचे भूमिका,कायद्यातील शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. गावात शांतता व सलोख्याचे वातावरण ठेवण्याचे जबाबदारी ग्रामसेवक तलाठी व पोलीस पाटील यांच्या आहेत असे सांगितले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक मा.गटविकास अधिकारी यांनी केले, प्रांताधिकारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच सदस्य व एनडीएमजे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.पंकज काटे यांनी अगदी रास्त मुद्दा मांडला की ज्यांना खरच या कार्यशाळेची गरज आहे तेच जर उपस्थित नसतील तर या कार्यशाळेचा हेतू साध्य होत नाही. असे यापुढे झाल्यास कार्यशाळेत न येणाऱ्यांवरती कारवाई करावी असा मुद्दा उपस्थित केला.

सदस्य शहाजी ननवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त  केले.

कार्यशाळेस उपस्थित एन.डी.एम.जे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.पंकज काटे,येताळा खरबडे,अविनाश ताकतोडे, समाधान धांडोरे, समाजिक कार्यकर्ते अजमेर दरवेशी,पिनू पांडगळे हे उपस्थित होते.

१३ फेब्रुवारी २०२५

जातीय सलोखा राखण्यासाठी पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे: अँड रोहित एकमल्ली...



सांगोला गौरव न्युज नेटवर्क:
 ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटील यांनी किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्याचे रूपांतर मोठ्या गुन्ह्यामध्ये होण्याआधी ते गावस्वरूपी मिटवण्या साठी प्रयत्न करावेत  आणि त्याची प्राथमिक माहिती संबंधित पोलीस ठाण्यास द्यावी असे प्रतिपादन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे नेते अँड रोहित एकमल्ली यांनी केले उपविभागीय दक्षता समितीच्या वतीने आणि  प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवेढा येथे एक दिवसीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1889 जाणीव जागृती व जातीय सलोखा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेसाठी कायद्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून अँड  रोहित एकमल्ली यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी ग्रामीण भागातूनच उपायोजना होणे गरजेचे आहे आणि ॲट्रॉसिटी कायद्याची जनजागृती होणे गरजेचे आहे आणि या कायद्याचा वापर आणि गैरवापर यासंबंधी सविस्तर माहिती दिली दलितांवर होणारे अन्याय थांबण्यासाठी सरकार उपाययोजना राबवत आहे परंतु त्या उपाययोजना राबवण्यासाठी दक्षता कमिटी व संबंधित अधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे .. प्रांत अधिकारी बी.आर. माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली सदरच्या कार्यक्रमास मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव  गट विकास अधिकारी योगेश कदम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिसे आणि प्रणिती यादव तसेच उपविभागीय दक्षता समिती निमंत्रित सदस्य अविनाश शिंदे , उपविभागीय दक्षता समिती निमंत्रित सदस्य व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस जिल्हा अध्यक्ष पंकज कुमार काटे उपाध्यक्ष येताळा खरबडे तसेच अविनाश ताकतोडे शहाजी ननवरे परमेश्वर गेजगे  आदी मान्यवर  उपस्थित होते परंतु बोटावर मोजणे इतकीच उपस्थिती पोलीस पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते याबाबत प्रमुख वक्ते अँड रोहित एकमल्ली आणि नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे सर्व नेतेमंडळी यांनी नाराजी व्यक्त केली 
या कार्यक्रमास मंगळवेढा तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी  तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंत मोची ,गोपाळ आईवळे , नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस सांगोला ता अध्यक्ष समाधान धांडोरे यांनी उपस्थिती दर्शवली सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी केले आणि आभार प्रदर्शनाचे काम विस्तार अधिकारी हरिदास नरळे यांनी केले या कार्यक्रमासाठी पंचायत समिती लिपिक नंदकुमार स्वामी विस्तार अधिकारी आरोग्य माने व प्रशासन अधिकारी सरवदे यांचे विशेष सहकार्य लाभले

०७ डिसेंबर २०२३

मंगळवेढा नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष , मात्र कर वसूल करण्यात नगरपालिका व्यस्त .... देवदत्त पवार....


मंगळवेढा प्रतिनिधी: येताळा खरबडे

 मंगळवेढा हद्दी मध्ये बेरड गल्ली, सणगर गल्ली, किल्ला भाग परिसर या भागात गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत, सार्वजनिक संडास बाथरूम आहेत तिथे पाण्याची सोय नाही, सार्वजनिक महिला संडास बाथरूम आहेत तिथे दरवाजे नाहीत, गटारी मध्ये दगड पडले आहेत ते काढायला नगरपालिके ला वेळ नाही, पाऊस पडून 8 दिवस झाले पण रोड वरती गटारीं चे पाणी साठले आहेत ते अजून साफ केले नाही, सार्वजनिक मुतारी उघड्या अवस्थेत आहेत तिथे लक्ष नाही,



 किल्ला भागात मंगळवेढा चे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे 4 बुरुज त्या बुरुजाच्या बाजूला घाणीचे साम्राज्य आहे, बुरुजाच्या बाजूला सार्वजनिक मुतारी आहे ती पहिला काढून टाकावी अणि बुरुज परिसर लवकर स्वच्छ करावा अशी मागणी मनसे तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे परंतु नगरपालिका मात्र इतर कर गोळा करण्यात व्यस्त आहे, तुम्ही कर गोळा करा पण बाकी कामाकडे कोण लक्ष देणार, अशी चर्चा नागरिकातून  होताना दिसत आहे जनतेने बाथरूम साफ करायचे का जनतेने गटारी साफ करायच्या का? जर लवकरात लवकर बाथरूम मध्ये पाण्याची सोय नाही केली अणि रोड वर साठलेले गटारीचे पाणी नाही काढले तर सर्व घाण नगरपालिका आवारात आणून टाकू महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही लवकरात लवकर मंगळवेढा चे CO मा. कोल्हे साहेब यांनी स्वतः प्रामाणिकपणे याकडे लक्ष द्यावे अन्यथा मोठे जनआंदोलन उभा करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा देवदत्त पवार यांनी दिला


 ====================================

मंगळवेढा नगरपरिषदेने सर्व स्वच्छ्ता गृहाचा सर्व्हे केला आहे. 3 ठिकाणी नवीन स्वच्छ्ता गृह उभारणी साठी प्रस्ताव सादर आहे. एक साठेनागर या ठिकाणी नवीन स्वच्छ्ता गृहाचे कामही पूर्ण झाले आहे. स्वच्छ्ता गृहाची दररोज साफ सफाई केली जाते. स्वच्छ्ता गृहाची काही दरवाजे व भांडी फुटली आहेत ते नवीन बसवण्यासाठी ठराव होऊन निविदा मागवल्या आहेत. लवकरच काम सुरू होईल. मंगळवेढा शहरातील नागरिकांची गैरसोय होणार नाही. याबाबत नगरपरिषदेने यापूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. आम्हाला आमच्या  कर्तव्याची जाणीव आहे. 
 
स्वच्छता निरीक्षक- विनायक साळुंखे

======================================

२६ सप्टेंबर २०२३

माजी आमदार कै अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा आणि गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न....






 मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे


सोमवार दिनांक २५/०९/२३ रोजी महिला हॉस्पिटल मंगळवेढा येथे कै अण्णासाहेब पाटील यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा आणि गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला याप्रसंगी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन श्री. बबनराव जी बप्पा आवताडे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.श्री.शिवाजीराव काळुंगे सर, भाजपा विधानसभा अध्यक्ष श्री.राजेंद्र बापू सुरवसे जिल्हा सरचिटणीस श्री. शशिकांत नाना चव्हाण, डीव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील, श्री. विठ्ठल शुगरचे माजी चेअरमन श्री.भगीरथ भालके, यशोदा पतसंस्था चेअरमन मा.सौ. नीलाताई आटकळे मॅडम, श्री.संत दामाजी शुगर चे माजी व्हा चेअरमन श्री.रामचंद्र भाऊ वाकडे, संचालक श्री.मुरलीधर दत्तू, माजी नगरसेवक अजित जगताप, तहसीलदार श्री.मदन जाधव सो पोलीस निरीक्षण रणजित माने सो, न.पा.प्रशासनाधिकारी श्री.विनायक साळुंखे सो अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.अर्जुन चव्हाण, संपादक श्री.दिगंबर बापू भगरे, तालुकाध्यक्ष श्री.सचिन डोरले मालक, अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर माऊली भगरे, उद्योजक श्री.लहु ढगे, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली कोंडुभैरी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुदर्शन यादव, प्रा.श्री.नागणे सर, श्री. आनंद मुढे, श्री.अजित लेंडवे, शंकर गोवे, महेश डोरले, मोहन कस गावडे, भरत राजपुरोहित, शहाजी गायकवाड,आदी मान्यवर सर्व सत्कारमूर्ती व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

२२ सप्टेंबर २०२३

भिमनगर मधील धोकादायक शौचालयाच्या दुरुस्तीसाठी वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिकारी यांना निवेदन....





मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे

         आज दिनांक 22/9/2023 रोजी  भीमनगर मंगळवेढा येथील स्मशानभूमी रोड खवतोडे गल्ली शेजारील मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे सार्वजनिक शौचालय अतिशय निकृष्ट स्थितीत असून सदर शौचालय वृद्ध महिला, पुरुष व लहान मुले वापर करतात. यापूर्वी मंगळवेढा तालुक्यामध्ये अशा धोकादायक शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या सफाई कर्मचारी यांचा शौचालयच्या टाकीमध्ये पडून टाकीमधील गॅसमुळे मृत्यू झाला होता.

       भिमनगर मधील दोन्हीही शौचालये ही अतिशय निकृष्ट असून पडण्याच्या स्थितीत आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्दैव घटना घडण्याची शक्यता आहे, तरी अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये,याची नगरपरिषदेने लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती उपायोजना करावी. अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी या नात्याने आपली राहील. म्हणून आपणास विनंती आहे की येणाऱ्या दहा दिवसांमध्ये आपण याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दोन्ही शौचालय दुरुस्ती अथवा नवीन बांधण्यासाठीच्या कामाची आपल्या स्तरावर त्वरित मंजुरी घ्यावी. अन्यथा या  निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडी मंगळवेढा च्या वतीने नगरपरिषद मंगळवेढा कार्यालयाच्या दालनासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल,याची नोंद असावी.

      यावेळी तालुकाध्यक्ष अशोक माने, जिल्हा संघटक वैभव भंडारे, शहर अध्यक्ष श्रीकांत कांबळे, शहर महासचिव अजय गाडे,शहर उपाध्यक्ष मेकांपा मोरे, माजी शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे,ता. संघटक पुष्पक सोनवले,लखन शिकतोडे,ता.प्रसिद्धीप्रमुख अंकुश शेवडे,तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सतीश लोकरे, महेंद्र ससाणे,अतुल खरबडे सर,दत्ता अवघडे, वसंत माने, अनिकेत खरबडे,रतन मोरे,रमा मस्के,कमल मस्के,विष्णू लोखंडे, विठ्ठल मोरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या या निवेदनावर सह्या आहेत..

बोगस प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाच्या मुलीची फसावणूक केलेल्या महा इ सेवा केंद्र धरकास मनसे च्या निवेदना नंतर दणका -देवदत्त पवार. तालुका उपाध्यक्ष मनसे.....


 मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे

दिनांक 18/09/2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना बोगस प्रमाणपत्र देऊन मराठा मुलीची फसवणूक करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र चालक तथा बोराळे ग्रामपंचायत मधील ऑपरेटर सुहास घोडके याला अटक करा म्हणून दिनांक 18 /9 /2023 रोजी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक सो गटविकास अधिकारी सो पंचायत समिती मंगळवेढा यांना देवदत्त पवार यांनी  निवेदन दिले होते त्या अनुषंगाने तहसीलदार  साहेब यांनी महा-ई-सेवा केंद्र चालक   सुहास घोडके यांचे  महा-ई-सेवा केंद्र दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी धनंजय इंगोले तलाठी भारत गायकवाड यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने बोराळे येथील महा-ई-सेवा केंद्र सिल ठोकले व मंगळवेढा तहसीलदार यांच्या आदेशाने दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा येथे सुहास घोडके यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तरी सुहास घोडके याला अटक अटक करावी व गोरगरीब जनतेचे फसवणूक थांबवावी

२८ मे २०२३

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे काम चांगले पण त्यांना विरोध करणारे समाजसेवक यांनी ब्लॅकमेलिंग चा धंदा बंद करावा - राकेश पाटील (तालुका उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष)...





मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे


   मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रणजीत माने साहेब यांचे काम जनतेसाठी चांगले आहे पण समाजसेवेच्या नावाखाली काम करणारे पुढारी यांची ब्लॅकमेलिंग बंद पडली त्यामुळे  पोलीस निरीक्षक च्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत आता दररोज पोलीस निरीक्षक यांचे सत्कार होत आहेत कारण त्यांनी घर फोड्या, मोटरसायकल चोर ,गुटखा पकडणे , विविध तंटे, तपास अशा विविध प्रकारची चांगली कामे केली आहेत  त्यामुळे त्यांच्यावर जनता खुश आहे पण भुरटे सुरटे किंवा ज्यांना गावात किंमत नाही ते आज म्हणत आहेत सत्कारापेक्षा काम करा अन्यथा संघर्ष अटळ असा सवाल करीत आहेत पण त्यांचे काम बघूनच वरिष्ठ अधिकारी यांनी माने  साहेब यांचा सन्मान, गौरव केला आहे त्यामुळे त्यांचा सत्कार ही मंगळवेढ्यातील जनता करीत आहे काही पुढाऱ्यांची चुलबंद पडली आहे त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे ब्लॅकमेलिंग चा धंदा सुरू केला आहे मंगळवेढा तालुक्यातील जनता ही डोळ्याने बघत आहे एकीकडे अधिकारी व दुसरीकडे जे विरोध करीत आहेत ते पुढारी मग या विरोध करणारा पैकी एकाने तर जनतेच्या प्रश्नासाठी पोलीस निरीक्षक यांना विरोध केला आहे का असा प्रश्न पडत आहे त्यांनी त्यांचे धंदे किंवा वैयक्तिक स्वार्थ बंद केल्यामुळे हे माने साहेब यांच्या विरोधात आवाज उठविला आहे पण जनतेच्या लक्षात आले आहे जे पुढारी विरोध करतात ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत त्यामुळे रणजीत माने यांच्या पाठीशी प्रहार जनशक्ती पक्ष कायमस्वरूपी असणार आहे आमचे दैवत आमदार बच्चू कडू यांचा सवाल असतो की चांगले काम करणाऱ्या  अधिकाऱ्यांचा सन्मान करा व चुकीचे 

काम करणाऱ्या अधिकाऱ्याला हाकलून द्या त्यामुळे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे काम हे चांगले आहे त्यामुळे सत्कार होत आहेत किंवा प्रहार कडूनही केला आहे त्यांचे काम सुरूच आहे पण जे पुढारी विरोध करीत आहेत किंवा समाजातील तेढ निर्माण करीत आहेत त्यांना प्रहार स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही.   अनथ्या खर काय खोटे काय हे दैवत बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी सांगितले आहे

 

२६ मे २०२३

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाच्या पाठीमागे जनतेने ठामपणे उभे राहावे-येताळा खरवडे....


 

मंगळवेढा: प्रतिनिधी

दलित चळवळीचे नेते येताळा खरबडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे, की मंगळवेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी पदभार घेतल्यापासून अनेक गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले आहेत मंगळवेढा मधील भुरटे दादागिरी करणारे अनेक असे दादा त्यांना माने साहेबांनी लगाम लावलेला आहे माने साहेबांच्या काळामध्ये सर्वात जास्त दरोडे घरफोडी असे कित्येक दिवसाचे पेंडिंग गुन्हे सुद्धा त्यांनी उघडकीस आणलेले आहेत अनेक सर्वसामान्य नागरिकांचे चोरीला गेलेले सोने त्यांनी पुन्हा मिळवून दिलेले आहे अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या विरोधात मंगळवेढ्यातील काही तथाकथित अध्यक्षांनी तक्रारीचा सूर लावलेला आहे,त्या अध्यक्षांचे मत म्हणजे संपूर्ण पक्षाचे किंवा तालुक्याचे मत असू शकत नाही सर्वसामान्य नागरिक माने साहेबांच्या कामगिरी वरती अतिशय समाधानी आहेत तक्रार करणारे हे कुठल्या उद्देशाने तक्रार करतात याची कल्पना मंगळवेढ्यातील सुज्ञ नागरिकांना चांगली माहीत आहे तक्रार करणाऱ्या पैकी काहींचा प्रताप या मंगळवेढ्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे तरी अशा या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाच्या पाठीमागे तालुक्यातील बहुसंख्य जनता ठामपणे उभे आहे वेळप्रसंगी माने साहेबांच्या समर्थनात सर्व जनता त्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरेल या तक्रारदारांच्या पाठीमागे एक वाळू माफिया व ब्लॅकमेलिंग करणारा असून त्यांचे वाळू चोरी मध्ये टिपर पकडलेले आहेत असे गुन्हेगार लोक जर प्रामाणिक अधिकाऱ्यावरती शिरजोर होऊ लागली तर भविष्यामध्ये मंगळवेढ्यामध्ये गुंडाराज आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की यासाठीच हे गुंडाराज संपवण्यासाठी मंगळवेढ्यातील सर्वसामान्य जनतेने गुन्हेगाराचे कर्दनकाळ ठरलेले पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या समर्थनात पोलीस अधीक्षक कोल्हापूर विभागाचे आय जी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्रव्यवहार करून रणजीत माने यांचं चांगलं काम नक्कीच आपण सांगावे व या अधिकाऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तालुक्यातील जनतेने उभे राहून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे मनोधैर्य वाढवावे एवढीच अपेक्षा करतो.

०५ जानेवारी २०२३

मंगळवेढा आदर्श नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न....


 मंगळवेढा प्रतिनिधी :येताळा  खरबडे 

डॉ आंबेडकर सार्वजनिक वाचनालय आदर्शनगर मंगळवेढा येथे विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक  मा.विजयकुमार खवतोडे  यांचे शुभ हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा.येताळा खरबडे सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख.एन.डी.एम.जे. , मा. पप्पू इनामदार, मा. यशवंत जगधने, मा. सुरज वाघमारे  , मा.समाधान धांडोरे ता.अध्यक्ष सांगोला  एन.डी.एम.जे, .मा.सुरेश मरिआईवाले. सुवर्णा यादव सामाजिक कार्यकर्त्या वाघमारे सर हे उपस्थित होते

०२ डिसेंबर २०२२

अपहरण पीडित बालकाचा तात्काळ तपास करा...... अन्यथा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढू मंगळवेढा येथील संतप्त महिलांची मागणी.....


 

मंगळवेढा प्रतिनिधी :येताळा खरबडे

मंगळवेढा दामाजीनगर येथील रणवीरकुमार साहू वय वर्ष ४ या बालकास दिनांक १८/११/२२ रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती . सदर घटनेची फिर्याद बालकाचे वडील मनोजकुमार साहू आणि आई यांनी तात्काळ मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दिली होती परंतु पोलिसांनी कसल्याही प्रकारची कर्तव्यनिष्ठता न दाखवता तपास केला नाही मंगळवेढा येथे यापूर्वी नरबळी सारखे प्रकार घडलेले यांना माहीत होते पोलीस प्रशासन म्हणजे जनसामान्य नागरिकांचे रक्षणकर्ते मानले जातात परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने रक्षण करताना दिसत नाहीत  मंगळवेढा परिसरामध्ये महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे     याचाच एक भाग म्हणून मंगळवेढा दामाजी नगर येथील संतप्त महिलांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक सोलापूर, विधानसभा आमदार समाधान अवताडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आदी मान्यवरांना निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले आहे अपहरण झालेल्या निष्पाप बालकाचा तात्काळ तपास करून त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन करा आणि बेजबाबदार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्यावर कारवाई करा अन्यथा मंगळवेढा पोलीस स्टेशनवर सबंध तालुक्यातील महिलांचा व लहान मुलांचा धडक मोर्चा आणि तीव्र आंदोलने केली जातील असा मंगळवेढा येथील महिलांनी इशारा दिला आहे  

सदर प्रकरणांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ लक्ष घालून बालकास शोधून आई-वडिलांच्या स्वाधीन करतील का ....?  याकडे सर्व मंगळवेढा नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे


२२ नोव्हेंबर २०२२

26 नोव्हेंबर संविधान दिन शासन निर्णयानुसार साजरा करावा .......नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस( एन डी एम जे) या सामाजिक संघटनेचे सर्व शासकीय विभागांना निवेदन...


 

मंगळवेढा प्रतिनिधी: येताळा खरबडे

आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी मा. वैभवजी गीते साहेब राज्य सचिव.नॅशनल दलित  मुव्हमेंट फॉर जस्टीस महाराष्ट्र राज्य. यांचे आदेशावरून दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिवस साजरा करणे बाबतचे निवेदन १)मा.उपविभागीय अधिकारी मंगळवेढा.२) मा.उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा.३) मा.पोलीस निरीक्षक मंगळवेढा.४)मा. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा.५) मा.विस्तार अधिकारी आरोग्य विभाग मंगळवेढा.६) मा.शिक्षणाधिकारी सो नगरपरिषद मंगळवेढा. यांना दिले यामध्ये विषय दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन साजरा करण्याचे सर्व विभागांना आदेश देऊन जो विभाग संविधान दिन साजरा करणार नाहीत त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांना देशद्रोही ठरवून बडतर्फ करणेबाबत..

 


           महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरिता राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस पुढील प्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व शासकीय निमशासकीय विभागांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात यावे संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालयांमार्फत त्यादिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाचे प्रस्ताविका मूलभूत हक्क कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातील महत्त्वाची कलमे ठळकरीत्या दिसतील असे बॅनर पोस्टर वापरावेत याबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा  भितीपत्रिके सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत संपूर्ण कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल व्हिडिओ शूटिंग फोटो 5 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठवावा 



ज्याप्रमाणे केंद्र सरकार व राज्य सरकार तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा हे अभिमान राबवण्यात आले आहे त्याचप्रमाणे हर घर संविधान असे अभियान प्रत्येक घरोघरी राबविण्यात यावे अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयीन प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य शाळांचे मुख्याध्यापक 26 नोव्हेंबर दिनी कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा ठेवून संविधान दिन साजरा करणार नाहीत अशा कार्यालयीन प्रमुखांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी



 सर्व विभागांचा वस्तुनिष्ठ अहवाल संविधान दिन साजरा केल्याचा व्हिडिओ चित्रीकरण करावे म्हणून आदेश देण्यात यावेत ज्या शाळा संविधान यात्रा प्रभात फेरी काढणार नाहीत अशा शाळांची मान्यता रद्द करावी शासकीय अधिकाऱ्यांनी कसूर केल्यास देशद्रोही समजून सेवेतून बडतर्फ करावे यामध्ये कसूर केल्यास संघटनेच्या माध्यमातून जे कार्यालयीन प्रमुख संविधान दिन साजरा करणार नाहीत अशांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल याची नोंद घ्यावी

      



  निवेदन देते वेळेस सोलापुर जिल्हाप्रसिद्धीप्रमुख. मा येताळा खरबडे.तालुका अध्यक्ष आबासाहेब झेंडे. सचिव मा शिरीष कुमार कांबळे. कार्याध्यक्ष मा गोपाळ आईवळे.सदस्य सुरेश मरिआईवाले. व मा. विश्वास बुरांडे आदि उपस्थित होते




२१ नोव्हेंबर २०२२

26 नोव्हेंबर संविधान दिन न साजरा करणाऱ्या शासकीय निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महाविद्यालय यांच्यावर कडक कारवाई व्हावी .....नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस( एन डी एम जे) या सामाजिक संघटनेचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन....


 


येताळा खरबडे :मंगळवेढा प्रतिनिधी


आज दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी माननीय वैभवजी गीते राज्य सचिव नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस एन डी एम जे यांच्या आदेशावरून दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिवस साजरा करणे बाबतचे निवेदज्ञन मंगळवेढा तहसीलदार माननीय श्री सुधाकर धाईंजे साहेब तसेच माननीय गटविकास अधिकारी श्री शिवाजी जयसिंगराव पाटील साहेब यांना दिले त्यामध्ये विषय दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस साजरा करण्याचे सर्व विभागांना आदेश देऊन जो विभाग संविधान दिन साजरा करणार नाही त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांना देशद्रोही समजून बडतर्फ करणेबाबत ...महोदय वरील विषयास अनुसरून निवेदन सादर करतो की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर 2008 च्या शासन निर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरिता राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे 



सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळांन महाविद्यालय माध्यमिक शाळांनी संविधान दिवस पुढील प्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात यावे संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालयांमार्फत त्यादिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मूलभूत हक्क कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातील महत्त्वाची कलमे ठळकरीत्या दिसतील असे बॅनर पोस्टर वापरावेत याबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध भितीपत्रके सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने कार्यक्रम आयोजित करावेत संपूर्ण कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल व्हिडिओ शूटिंग फोटो दिनांक 5 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठवावा ज्याप्रमाणे केंद्र सरकार व राज्य सरकार तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले आहे त्याचप्रमाणे हर घर संविधान असे अभियान प्रत्येक घरोघरी राबविण्यात यावे अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयीन प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य शाळांचे मुख्याध्यापक 26 नोव्हेंबर दिवशी कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून संविधान दिन शासनाच्या आदेशानुसार संविधान दिन साजरा करणार नाहीत अशा कार्यालयीन प्रमुखांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी सर्व विभागांचा वस्तुनिष्ठ अहवाल संविधान दिन साजरा केल्याचा व्हिडिओ चित्रीकरण करावे म्हणून आदेश देण्यात यावेत ज्या शाळा संविधान यात्रा प्रभात फेरी काढणार नाहीत अशा शाळेची मान्यता रद्द करावी शासकीय अधिकाऱ्यांनी कसुर केल्यास देशद्रोही समजून सेवेतून बडतर्फ करावे यामध्ये कसुर केल्यास संघटनेच्या माध्यमातून जे कार्यालयीन प्रमुख संविधान दिन साजरा करणार नाहीत अशांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल याची नोंद घ्यावी हे निवेदन देते वेळेस जिल्हाप्रसिद्धीप्रमुख मा. येताळा खरबडे( एन डी एम जे) तालुका अध्यक्ष मा. आबासाहेब झेंडे (एन डी एम जे) सचिव मा. शरीषकुमार कांबळे साहेब (एन डी एम जे) कार्याध्यक्ष मा. गोपाळ आईवळे(एन डी एम जे) सदस्य मा. सुरेश मरिआईवाले एन डी एम जे व सदस्य मा. विश्वास बुरांडे (एन डी एम जे )इत्यादी उपस्थित होते.

१७ ऑक्टोबर २०२२

ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्या .... अमोगसिद्ध काकनकी..



 मंगळवेढा/येताळा खरबडे........

ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्या -मागील 15 ते 20 दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने मंगळवेढा तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी, १०० टक्के नुकसान झाल्यामुळे विम्याची १०० टक्के रक्कम देण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी तहसीलदार सुधाकर धाइंजे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतजमिनीचे व शेतातील खरीप पिकांचे सोयाबीन, ऊस,तुर,मग, व रब्बी हंगामातील ज्वारी,तसेच इतरही पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.द्राक्ष बागा,डाळिंब तसेच इतरही फळ बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान प्रचंड झाले आहे. कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ हे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम  आहे. पिकले तर त्याला खर्चावर आधारित भाव ही मिळत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

 ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी 2021 रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते.आता स्वतः ते सत्तेत आहेत त्यामुळे त्यांनी तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी

 "परतीच्या पावसानं मंगळवेढा तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळणं गरजेचं आहे. पण सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, यापलीकडे काही केलं जात नाही.ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50000 मदत न दिल्यास जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी संघटनांना सोबत घेऊन तहसील कार्यालया समोर जन आंदोलन उभा करणार असल्याचे मत तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी व्यक्त केलं आहे

यावेळी राजेंद्र सावंत, अमोगसिद्द्ध काकणकी,चेतन वाघमोडे,सुभाष सरगर,नवनाथ शिरसटकर, सर्जेराव गाडे, लखन सर्जे, महेश तळ्ळे,दत्ता पाटील, शशी कोळी,इतर ही कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

०६ सप्टेंबर २०२२

मंगळवेढा तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवा ......तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांची बच्चुभाऊ कडू यांच्याकडे मागणी...

मंगळवेढा :प्रतिनिधी :
आज 6 सप्टेंबर रोजी मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना करमाळा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या ठिकाणी तालुक्यातील जनतेला भेडसावत असणारे प्रश्न, समस्या बच्चु भाऊ समोर मांडण्यात आल्या. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील पी एम किसान योजनेचे संदर्भातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी, चाळीसगावचा पाण्याचा प्रश्न, तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार तसेच बोगस डॉक्टर यांच्यवर्ती कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर मंगळवेढा नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी शहरातील समस्यांकडे केलेले दुर्लक्ष रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय,लाईट,नगरपालिका शाळेतील स्वच्छ्ता असेल. तसेच इतर ही प्रश्न, समस्या मांडण्यात आल्या यावरती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संबंधित प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी तालुका संपर्कप्रमुख तानाजी माने तालुका उपाध्यक्ष सुभाष सलगर, चेतन वाघमोडे, दत्ता पाटील विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

२८ ऑगस्ट २०२२

मंगळवेढा येथे एन डी एम जे ची बैठक संपन्न

मंगळवेढा :येताळा खरबडे आज दि.२८/०८/०२२रोजी.नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र (NDMJ) या सामाजिक संघटनेची मिटींग.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मंगळवेढा येथे.(सोलापुर जिल्हाध्यक्ष) पंकज काटे साहेब यांचे आदेशावरून.जिल्हा ( सोलापूर प्रसिद्धीप्रमुख.NDMJ).येताळा खरबडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजना सर्व सामान्य पर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विविध विषयाची सर्व साधारण मीटिंग घेण्यात आली यावेळी मंगळवेढा नूतन (तालुकाध्यक्ष.NDMJ) आबासाहेब झेंडे.(सचिव.NDMJ).शिरीषकुमार कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) दीपक शिवशरण युवा नेते अंकुश शेंबडे तसेच प्रमुख उपस्थिती.या कार्यक्रमाची सांगता कविवर्य.संगीतकार. गायक मा.धनंजय माने सर स्वहलिखित भीम गीताने झाली

२३ ऑगस्ट २०२२

आरोग्य मित्र पुरस्काराने डॉ आशिषकुमार सुना सन्मानित

मंगळवेढा प्रतिनिधी: येताळा खरबडे : मरवडे ता मंगळवेढा येथील डॉ आशिषकुमार सुना यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांचे आरोग्य ठणठणीत व निरोगी राहण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून ग्रामीण भागातील जनतेला अल्प दरात औषध उपचार करून देणे वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबीरे भरवून अतिशय माफक दरात औषध उपचार करत आहेत, ओरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी भिमराज प्रतिष्ठान मरवडे च्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सर्व मरवडेकर मित्र परिवार उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आली,,,,

"त्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा द्या" -अ.भा.रिपब्लीकन पक्षाची पंढरपूरात उग्र निदर्शने

मंगळवेढा प्रतिनिधी: येताळा खरबडे: राजस्थान राज्यातील जालोर जिल्हयातील सुराणा गावातील नऊ वर्षीय इंद्र मेघवाल या विदयार्थ्याच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या शाळेचा मुख्याध्यापक छैल सिंग व त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लीकन पक्षाने भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तहसिलदार पंढरपूर यांच्यामार्फत केली आहे.           मंगळवार दि.23 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता अखिल भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर उग्र निदर्शने करण्यात आली.  यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे म्हणाले की, देश स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पाण्यासाठी एक दलित बालकाला आपला जीव गमवावा लागणे ही अत्यंत शरमेची व माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.            राजस्थानच्या जालोर जिल्हयातील सुराणा गावातील सरस्वती विदयामंदिर या शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या इंद्र मेघवाल या दलित विदयार्थ्याला केवळ त्याने शिक्षकासाठी असलेल्या माठातील पाणी पिले म्हणून शाळेतील मुख्याध्यापक छैल सिंग यांनी दि. 22 जुलै 2022 ला अत्यंत क्रुरपणे जातीवादी अस्पृश्यतेच्या मानसिकतेतून जबर मारहाण केली.  त्यामुळे या विदयार्थ्याचा उपचारा दरम्यान 13 ऑगस्ट रोजी मृत्यु झाला.            इंद्रकुमारच्या या मृत्युला जबाबदार असलेल्या आरोपी छैल सिंग व त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य दोषी व्यक्तीवरती कठोर कारवाई करुन  त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सदरचे प्रकरण तथाकथित लोक सदरचे प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असून असे झाल्यास संपूर्ण राज्यामध्ये अखिल भारतीय रिपब्लीकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा साखरे यांनी दिला.  यावेळी पंढरपूर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार पंडीत कोळी यांनी आंदोलन कर्त्यांना सामोरे येवून त्यांचे निवदन स्विकारले व आंदोलन कर्त्यांच्या मागण्या व भावना राष्ट्रपती महोदयांना आजच कळवित असल्याचे सांगितले.            या आंदोलनास दलित स्वयंसेवक संघाचे संस्थापक दिलीप देवकुळे, दलित पँथरचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदु खरे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा माया खरे,  पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष पदमिनी शेवडे, श्रीमंत आठवले, तालुकाअध्यक्ष लक्ष्मण तात्या वाघमारे, वनिता वजाळे, सोमण्णा सपांगे, रविंद्र काळे, प्रभावती गायकवाड, मंगल कांबळे, गवळण लोखंडे, राहुल लोखंडे, वैशाली चंदनशिवे, शब्बीर सयद, बाळाताई डावरे, प्रा.हणमंत आढाव, सुरेश शेवडे, समाधान काळे, अविंदा गायकवाड, संभाजी कुंभार, आक्काताई शिंदे, इंदु ढवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.