Breaking News

१४ फेब्रुवारी २०२५

मंगळवेढा जी.सोलापूर या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 ( ॲट्रोसीटी ) जाणीव जागृती व जातीय सलोखा कार्यशाळा संपन्न झाली.


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

या कार्यशाळेला उपविभागिय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, दक्षता कमिटीचे सदस्य तथा निमंत्रित सदस्य  व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक तरुण तडफदार युवा नेतृत्त्व तथा ऍड.रोहित एकमल्ली यांनी जोरदार आक्रमक भाषा शैलीत सर्वांना मार्गदर्शन केले.

एडवोकेट रोहित एकमल्ली यांनी ॲट्रॉसिटी कायद्यातील प्रमुख तरतुदी कलम निहाय माहिती देताना ॲट्रॉसिटी चा तपास करताना घ्यावयाची काळजी, तपासातील त्रुटी, पोलीस पाटील, ग्रामसेवक,तलाठी यांच्या जबाबदाऱ्या, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची कायदा वस्तू व्यवस्था राखण्यासंदर्भात कर्तव्य जबाबदाऱ्या, प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची कार्य या विषयांवर सखोल मार्गदर्शन करत असताना फिर्यादी व साक्षीदारांच्या अधिकार व तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताना येणाऱ्या अडचणी याबाबतीत त उपस्थित पोलीस यंत्रणा तहसीलदार प्रांत यांना मार्गदर्शन केले.

दक्षता कमिटीचे सदस्य अविनाश ताकतोडे  यांनीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारांना सन्मानाचे वागणे द्यावी. तात्काळ तक्रार दाखल करून घ्यावी. दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे घ्याव्यात म्हणून मार्गदर्शन केले.

पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा आणी महत्वाचा कणा आहे. त्यांनी गावस्तरावर ज्या  ताण तणावाच्या घटना घडण्याच्या शक्यता वाटते  त्या पुढील अधिकाऱ्यास कळवल्या पाहिजेत. अन्यथा ताण-तणावाची माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवरती ग्रह विभागाच्या शासन निर्णयानुसार निलंबनाची कारवाई करावी अशी ही मागणी सदस्य अविनाश ताकतोडे यांनी केली.

 समितीचे सदस्य परमेश्वर गेजगे यांनी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची उपयुक्तता व पोलिसांचे भूमिका,कायद्यातील शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. गावात शांतता व सलोख्याचे वातावरण ठेवण्याचे जबाबदारी ग्रामसेवक तलाठी व पोलीस पाटील यांच्या आहेत असे सांगितले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक मा.गटविकास अधिकारी यांनी केले, प्रांताधिकारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच सदस्य व एनडीएमजे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.पंकज काटे यांनी अगदी रास्त मुद्दा मांडला की ज्यांना खरच या कार्यशाळेची गरज आहे तेच जर उपस्थित नसतील तर या कार्यशाळेचा हेतू साध्य होत नाही. असे यापुढे झाल्यास कार्यशाळेत न येणाऱ्यांवरती कारवाई करावी असा मुद्दा उपस्थित केला.

सदस्य शहाजी ननवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त  केले.

कार्यशाळेस उपस्थित एन.डी.एम.जे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.पंकज काटे,येताळा खरबडे,अविनाश ताकतोडे, समाधान धांडोरे, समाजिक कार्यकर्ते अजमेर दरवेशी,पिनू पांडगळे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा