Breaking News

औरंगाबाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
औरंगाबाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०६ सप्टेंबर २०२२

आमदार खासदार ईडीच्या धाकाने बीजेपीत तर मुस्लिम तरुण वंचित बहुजन आघाडीत - वंचित प्रवक्ते फारुख अहमद..

प्रतिनिधी / संतोष कदम :औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील आमदार खासदार ईडी सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकु नाही म्हणून बीजेपीत जात असुन मराठवाड्यातील सर्व जाती धर्मातील सामान्य तरुण मात्र वंचित बहुजन आघाडीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत आहेत . वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रदेश प्रवक्ते माननीय फारूक अहमद यांनी सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे जाहीर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद शहरातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकासह अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. यावेळी फारूक अहमद म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा पक्ष असून या पक्षांमध्ये मुस्लिम दलित वंचित फार मोठ्या प्रमाणात जुळल्या जात आहेत . त्याचे कारण असे आहे की, दोन वंचित शोषित, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी समाज एक झाल्यास औरंगाबादचा खासदार आपण निवडून आणला त्यामुळे लोकांना अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आत्मियता असुन वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असा आहे जो आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो हे आता लोकांना कळुन चुकल्यामुळे सर्व समाजाचे लोक वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होत आहेत असे फारूक अहमद म्हणाले . एन आर सी सीएए असो की औरंगाबाद येथील शाहीन बाग असो हे सगळे जण आंदोलन औरंगाबाद मध्ये झाल्यामुळे लोकआकर्षित झाले आहेत आपण जर आपली स्वतःची सुरक्षितता नातेवाईकांची आणि समाजाची सुरक्षा पहात असाल तर आपल्याला संविधानाचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सोबत आलं पाहिजे. हैदराबाद मधील नऊ वर्षाच्या बालिकेवर अन्याय अत्याचार केलेल्या आरोपींना पोलिसांनी गोळ्या घातल्या गोळ्या घातल्याचे संबंध महाराष्ट्रभर समर्थन केले गेले मात्र बिलकुस बानू यांच्यावरती बलात्कार आणि खुन करनाऱ्यांना न्यायालयाने दोषि ठरवूनही खूनी आरोपींना सोडण्यात आले. आणि त्यांचा सत्कार करण्यात आला अशी मानसिकता इथल्या लोकांची झाली आहे ही मोडीत काढण्यासाठी सध्या अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षात सामील झाले पाहिजे.महाराष्ट्रा मध्ये जेवढे मुसलमानांची लोकसंख्या आहे त्या प्रमाणात तीस ते पस्तीस आमदार निवडून यायला पाहिजे मात्र 2009 वगळता मुस्लिमांचे 11 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले नाहीत किंबहुना मुस्लिमांना उमेदवारी सुद्धा दिल्या जात नाही . मुस्लिमांना उमेदवारी देणारा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी आहे.. एम आय एम सोबत युती करण्याच्या प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले ओबीसी बहुजन समाजाने मुस्लिमांचा खासदार निवडून दिल्याने वंचित बहुजन आघाडी ने लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे त्या विश्वासास पात्र म्हणून मुस्लिम वर्ग मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी मध्ये सहभागी होत आहे काँग्रेसचे अशोक चव्हाण बीजेपी मध्ये जात आहेत असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले शंकरराव चव्हाण नांदेडला आले तेव्हा सायकल लोटा घेऊन आले होते. आता मात्र जेव्हा त्यांच्या मुलाची संपत्ती सांगितले जाते तेव्हा 1000 कोटीच्या वर आकडा आहे. त्यांचे घोटाळे उघडे पडू नये म्हणून अशोक चव्हाण बीजेपी मध्येच काय तर कोणत्याही पक्षात जाऊ शकतात असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, मध्य शहराध्यक्ष जलीस अहमद, युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, कामगार आघाडी शहराध्यक्ष राजू देहाडे, युवा महासचिव सतीश शिंदे, अफसर पठाण,सलिम पटेल महिला शहर अध्यक्षा वंदनाताई नरवडे, शितल बनकर, वर्षा खरात,सय्यद जफर, शादाब सिद्दीकी,पंढरीनाथ भालेराव,आदींची प्रमुख उपस्थिती होती.