Breaking News

सांगोला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांगोला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१३ फेब्रुवारी २०२५

सांगोला तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करावे-रविंद्र कांबळे.....


सांगोला (प्रतिनिधी)

सांगोला तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रे तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज क्रांती संघटने संस्थापक अध्यक्ष व पत्रकार रवींद्र कांबळे यांनी सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 निवेदनात म्हटले की, विविध प्रमाणपत्राचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले यास प्रतिज्ञापत्र, सातबारा हे महा-ई-सेवा केंद्रांमार्फत दिली जातात. तहसील समोरील व इतर केंद्र चालक वाजवी दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे घेतात. प्रमाणपत्र वितरीत करण्यास अडवणूक करून आर्थिक लुबाडणूक करतात व प्रमाणपत्रही वेळेवर दिले जात नाही, त्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना, खूप मोठा त्रास होत आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सांगोला तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे. जेणेकरून जनतेची लुबाडणूक न होता शासनाने निश्चित केलेल्या वाजवी दरामध्ये व विहित मुदतीत जनतेला विविध प्रमाणपत्रांचे दाखले मिळतील. त्यामुळे सांगोला तहसील आवारातील शासनाचे सेतू सविधा केंद्र सुरू करावे,अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे.

०६ फेब्रुवारी २०२५

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या (उजनी उपसा सिंचन योजना) कामाचे 14 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन- शहाजीबापू पाटील. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते 300 कोटींच्या कामाचा शुभारंभ..


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे 22 गावांसाठी वरदायिनी असणारी व गेली 25 वर्षे मंजुरीच्या प्रतिक्षेत असणारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना म्हणजे पूर्वीची उजनी उपसा सिंचन योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी चिकमहूद येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली भूमिपूजनाच्या कार्यक्रमासोबत कार्यक्रम स्थळी शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.

सन 2000 साली  78.59 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती परंतु पुढील पाच वर्षे या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्याने 2005 साली प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती सन 2019 साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केला त्यांनी या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण शासनाकडून मंजूर करून घेतले व नव्याने 10 गावांचा या योजनेमध्ये समावेश करून एकूण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 22 गावांना या योजनेच्या दोन टीएमसी पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून 27 फेब्रुवारी 2024 रोजी 883.74 कोटी रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यास आमदार शहाजी बापू पाटील यांनी यश मिळवले.

 एकूण 884 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश देण्यात आले होते परंतु निवडणूक आचारसंहिता व मंत्रिमंडळ निवड यामुळे या कामाचे भूमिपूजन लांबले होते.

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्याची विनंती मुंबई येथे केली होती यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी या योजनेचा भूमिपूजन व शुभारंभ कार्यक्रमाला वेळ दिली असून हेलिकॉप्टरने महूद येथे येणार असल्याचे शहाजीबापू यांना कळविले आहे.

या योजनेचे काम सुरू होणार असल्याने 22 गावांमधील सुमारे 13055 हेक्टर शेतजमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार असून पुढील टप्प्यातील उर्वरित कामानाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.

०४ फेब्रुवारी २०२५

श्री अंबिकादेवी यात्रेनिमित्त बुधवारी जंगी कुस्त्यांचे मैदान..

 


सांगोला : तालुका प्रतिनिधी 

सांगोला शहर आणि तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबिकादेवी यात्रा निमित्त बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन केले असल्याची माहिती कोर्ट रिसिवर सांगोला यांनी दिली. 

बुधवार दि ५ रोजी दु ४.०० पासून या जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. या कुस्ती मैदानासाठी संपूर्ण राज्यभरातून आणि सोलापूर जिल्ह्यातून नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. तरी, सांगोला शहर आणि तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी कुस्त्यांची दंगल अनुभवण्यासाठी क्रीडा संकुल मैदान सांगोला येथे उपस्थित राहावे असे आवाहन श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती तथा कोर्ट रिसिव्हर सांगोला यांनी केले.

०१ फेब्रुवारी २०२५

श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त रंगभरण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा....


 सांगोला : प्रतिनिधी 

सांगोला शहर आणि तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून परिचित असलेल्या श्री. अंबिकादेवी यात्रेनिमित्त रविवार दि 2 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी, व इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातून घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना कोर्ट रिसिवर व श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे.

तसेच सोमवार दि 3 जानेवारी रोजी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा इ ८ वी ते इ १० दरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन स्पर्धकांना श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या स्पर्धकांनी ॲड.सारंग वांगीकर ॲड.  विक्रांत बनकर ॲड. नितीन बाबर, ॲड. विशालदीप बाबर ॲड. शशिकला खाडे व ॲड. महेंद्र पत्की यांनी केले आहे.

३० जानेवारी २०२५

वनपरिक्षेत्र सांगोला (प्रा) मालकी क्षेत्रात वनविभागाची मोठी कारवाई. विनापरवाना वाहतूक करणारा ट्रकसह कडुलिंब जळाऊ लाकूड मालासह जप्त..


 सांगोला: सचिन धांडोरे:

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला वनपाल सांगोला व वनरक्षक सांगोला यांनी सांगोला ते मिरज रोड येथे रात्रीची फिरती करत असताना २८/०१/२०२५ रोजी सदरचा ट्रक क्र MH 45 0180 मध्ये कडुलिंब जळाऊ लाकूड २२.६३८ घ . मी दिसून आले वाहन चालक यांच्याकडे वन विभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पाच परवाना नसल्याचे दिसून आले पंचनामा जबाब कागदपत्रे जप्त केली लाकूड मालाचे अंदाजे १० टन व किंमत अंदाजे ३०००/ होईल अनिल श्रीशैल बिराजदार या शिरठोन या चडचण जि विजापुर वाहन चालक राजू लक्ष्मण सोलकर रा कात्राळ ता  मंगळवेढा जि सोलापुर ट्रक मालक बिराप्पा लक्ष्मण सोनलकर या शिरठोन ता चडचण लाकूड व्यापारी माळाप्पा लक्ष्मण माने  रा कात्राळ ता मंगळवेढा जि सोलापुर शेतकरी यांनी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक केले बद्दल लाकूड मालासह वाहन जप्त केले या चार व्यक्तीवर वनरक्षक सांगोला यांनी प्रथम वनगुन्हा क्र ओ ०२/२०२५ दि २८/०१/२०२५ या नुसार वनगुन्हा नोंद केला आहे विनापरवाना वृक्षतोड करणे व विनापरवाना वाहतूक करणे आरोपी यांना वन गुन्हा मान्य आहे त्यामुळे कारवाई केली पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला करीत आहेत. 


वन विभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी वन विभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावे अवैद्य वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहान तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे ज्या झाडापासून धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा प्रत्येक माणसाला झाडापासून एका दिवसाला १५ कि. ग्रॅ ऑक्सिजन लागतो ज्या झाडाचे गोलाई साधारण ६ ते ७ फुट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला  १५ कि. ग्रॅ ऑक्सिजन मिळतो असे पर्यावरण तज्ञ यांचे मत आहे जाळे आहेत म्हणून आपण आहोत याची जाणीव कोरोना च्या काळात आपल्याला माहिती झाली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा तसेच सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे वृक्षतोड बंद करून व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून सांगोला तालुका दुष्काळग्रस्त मुक्त करता येईल असे आव्हान तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे वन क्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैद्य वृक्षतोड व अवैद्य वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर ९४२०३७८२७९ वर संपर्क साधावा असे आवाहान केले आहे. सदरची कारवाई मा मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे एन आर प्रविण मा उपवनसंरक्षक सोलापूर लेफन्टंट कुशाग्र पाठक व मा सहा वनसंरक्षक (कॅम्पा) सोलापूर व्ही .एम .चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदरची कारवाई तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व जे.जे खोंदे वनपाल सांगोला वनरक्षक सांगोला जी. बी व्हरकटे यांनी केली आहे.

२८ जानेवारी २०२५

श्री अंबिकादेवी यात्रेला 30 जानेवारी पासून प्रारंभ..... यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी सहा वकीलांची कोर्ट रिसिव्हर म्हणून नियुक्ती.....


 सांगोला: तालुका प्रतिनिधी 

सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेस गुरुवार दिनांक 30 जानेवारीपासून प्रारंभ होणार येणार असून मंगळवार दिनांक 28 जानेवारी व बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी जागा वाटप सकाळी 11.30 ते 2 व दुपारी 4 ते 6 यावेळेत करण्यात येणार आहे. शुक्रवार दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी आकर्षक दारुकामाने सांगोला यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत नेहमीप्रमाणे शेती विषयक प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा, जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम व शोभेचे दारुकाम आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

यंदा यात्रेत दुकानदारांची, व्यावसायिकांची रेलचेल असणार आहे. त्याचप्रमाणे पाळणे, खेळण्याची दुकाने, मिठाई, जिलेबी दुकाने, गृहउपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची साधने, शेतीची औजारे आदी विक्री करणारे लहान-मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने येणार आहे. मा.जिल्हा न्यायाधिश साो, पंढरपूर यांनी दि.24 जानेवारी रोजी अंबिकादेवी यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी कोर्ट रिसीव्हर म्हणून सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर, अ‍ॅड.श्री.विक्रांत प्रकाश बनकर, अ‍ॅड. श्री.विशालदीप विजयसिंह बाबर, अ‍ॅड.श्री.नितीन गुलाबराव बाबर, अ‍ॅड.सौ.शशिकला सुधीर खाडे, अ‍ॅड.श्री.महेंद्र मारुती पत्की यांची नेमणूक केली आहे.

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यात्रा भरणार असून रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर (मो.9420666551)  , अ‍ॅड.श्री.विक्रांत प्रकाश बनकर (मो.9307955455), अ‍ॅड. श्री.विशालदीप विजयसिंह बाबर (मो.9822273480,), अ‍ॅड.श्री.नितीन गुलाबराव बाबर (मो. 9405437822), अ‍ॅड.सौ.शशिकला सुधीर खाडे (मो. 8552815599), अ‍ॅड.श्री.महेंद्र मारुती पत्की (मो.9403938794) यांनी दिली.



२६ जानेवारी २०२५

सांगोला तालुक्यातील अवैधरित्या सुरू वाळू उपसा बंद करा... परंपरागत वाळू वसूलदाराला कोणाचं अभय -दत्तात्रय सावंत....


 सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात सध्या नदीपात्रातून प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उत्खनन केले जात आहे तसेच तालुक्यात बेकायदेशीर व्यवसाय वाढले असून, याकडे प्रशासकीय अधिकार्‍याकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांची व महसूल विभागाच्या अधिकारी यांची भूमिका वाळू माफियांना प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा असून नदीतून अवैधरित्या दिवसेंदिवस या वाळु उपशाचे प्रमाण वाढत चालले आहे. परंपरागत असणार्‍या वाळू वसुलदारामुळे अवैध वाळू वाहतूक  मोठ्या प्रमाणात सुरु असून या वाळू वसुलदारास कोणाचा आशिर्वाद आहे असा संतप्त सवाल उपस्थित करुन अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करुन तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.

सांगोला शहरातील खारवटवाडी परिसरासह तालुक्यातील वाटंबरे, नाझरे, कोळा, कडलास, जवळा, सोनंद या भागातून मध्य रात्रीपासून पहाटेपर्यंत डंपर, टेम्पो आदी अवजड वाहनांतून वाळूची वाहतूक होत आहे. या वाहतुकीकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अप्रत्यक्ष आशीर्वाद देत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सांगोला तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून वाहतूक करण्यात येत आहे. बेकायदा वाळू उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत असताना महसूल खात्याचे स्थानिक अधिकारी गप्प का, असा सवालही विचारला जात आहे.

गेल्या काही वर्षात राजरोस वाळू उपसा करण्यात येत होता. तसेच दिवसभर वाळू वाहतूक करण्यात येत असे, मात्र आता वाळू माफियांनी आपले वेळापत्रक बदलून आता पहाटेचा वेळ निवडला आहे. अवजड वाहने आणि वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक करण्यात येत असल्याने वाळू वाहतूक करणार्‍या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाळूने भरलेले डंपर चालक रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अन्य छोट्या वाहनांना बाजू देत नसल्याने मोटारसायकल, जीप आदी छोट्या वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांची व महसूल विभागाच्या अधिकारी यांची भूमिका माफियांना प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा आहे. अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. वाळू माफिया हे साम, दाम दंडासह लोकांना धमकावून, आर्थिक तोड-पाणी करून गावागावात दहशतीचे वातावरण करत आहेत. गावातील सलोखा बिघडत चालला आहे. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात वाळू माफियांचा उघड वावर असल्याचे लोक खाजगीत बोलत आहेत. अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफीयांना पाठीशी घालणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर देखील कारवाई करण्यात यावी.अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून तालुक्यातील रस्ते खराब होऊ लागले आहेत तसेच सदर वाळू उपसा हा शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दिवसरात्र सुरु आहे. लाखो ब्रास वाळू माफिया उचलत असल्यामुळे शासनाचा महसूल (रॉयल्टी) बुडत आहे.

वाळू वाहतूक करणार्‍या अवजड वाहनामुळे रस्त्याची परिस्थितीही धोकादायक बनत चालल्याने वहातुकीस अडथळे निर्माण होणार आहेत. पोलिस आणि संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई करावी, अशी मागणीही दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.

२२ नोव्हेंबर २०२४

सांगोला विधान सभेसाठी मतमोजणी निरीक्षक अभिषेक गहलोत यांची नेमणूक

 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क :

        253 सांगोला विधानसभा  मतदारसंघची मतमोजणी दिनांक 23/11/24 रोजी  सकाळी आठवाजता सुरू होणार आहे मतमोजणीचे कामकाज पाहण्या करिता भारत निवडणूक आयोग यांचेकडून ऑब्झर्वर म्हणून आयोगाचे मतमोजणी निरीक्षक अभिषेक  गहलोत साहेब आपल्या मतदारसंघाकरिता  उपस्थित झालेले असून ते शासकीय विश्रामगृह सांगोला येथे निवासी असून त्यांचा मोबाईल नंबर 9322779016 असा आहे कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन मिडीया नोडलअधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे

१७ ऑक्टोबर २०२४

माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांचे दुःखद निधन....


 

सांगोला : रिपब्लिकन पँथर आँफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक सांगोला येथिल दलित चळवळीतील धडाडीचे नेते सुरजदादा देवा बनसोडे यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने सोलापुर येथिल खाजगी रुग्णालयात सायकांळी ६ वाजणेच्या सुमारस उपचारादरम्यान दु:खद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ४४ वर्षे इतके होते.त्यांच्या पाश्चात आई,पत्नी,दोन मुले,भाऊ,बहिण,भावजय,चुलते,मेहुणे असा मोठा परिवार आहे.

सोलापुर जिल्हामधील दलित चळवळीतील अंत्यत धडाडीचा परखड,स्पष्टवक्ता नेता म्हणुन सुरजदादा यांची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे दलित चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त  समजताच सोलापुर जिल्हासह सांगोला तालुका व परिसरामधुन हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज शुक्रवार १८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० वाजता सांगोला भीम नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून सांगोल्यातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी  दिली.

१६ ऑक्टोबर २०२४

सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी रविराज शेटे तर सचिव पदी दत्तात्रय पवार यांची निवड....


 

सांगोला प्रतिनिधी 

 सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये अध्यक्षपदी रविराज शेटे तर सचिव पदी दत्तात्रय पवार यांची  निवड करण्यात आली आहे. 

          सदर प्रसंगी उपाध्यक्ष सचिन धांडोरे, दशरथ बाबर व बबनराव चव्हाण यांची तर खजिनदारपदी विशाल मोरे , तर सहसचिव पदी राजू होवाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात. आली . तर सदस्य म्हणून नानासो हालगंडे, निखिल काटे, संतोष बनसोडे, अतुल फसाले, जगदीश कुलकर्णी, आण्णासाहेब खरात, समाधान धांडोरे, देवदत्त धांडोरे, रंजीत महापुरे, विकास जावीर, वैभव काटे यांचे एकमताने निवड करण्यात आली . निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारिता  प्रथमच ग्रामीण पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे या संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे असे मत नूतन अध्यक्ष रविराज शेटे यांनी व्यक्त केले. यावेळी विनोद चंदनशिवे, दीपक धुकटे, सचिन कुंभार, महेश धांडोरे उपस्थित होते.

१७ जून २०२४

यलमार समाज आजी माजी सैनिक स्नेहमेळावा मोठया दिमाखात पार पडला....




सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

सैनिक ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असते. ते राष्ट्राचे रक्षक आहेत आणि प्रत्येक किंमतीवर तेथील नागरिकांचे रक्षण करतात. शिवाय, ते एक अत्यंत निस्वार्थी लोक आहेत ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक हितापेक्षा देशाचे हित ठेवले आहे. सैनिकाची नोकरी ही जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. त्यांनी आव्हानात्मक कर्तव्ये पार पाडली पाहिजेत आणि एक महान सैनिक होण्यासाठी त्यांच्याकडे अपवादात्मक गुण असावेत. मात्र, त्यांचे जीवन अत्यंत खडतर आहे. असे असले तरी, संकटांना न जुमानता ते नेहमीच त्यांचे कर्तव्य पार पाडतात.


दिनांक 16 जून 2024 रोजी 3 रा यलमार समाज आजी माजी सैनिक स्नेहमेळावा हा हॉटेल फाइव्ह स्टार सांगोला येथे मोठया दिमाखात पार पडला. मेळाव्यासाठी आजी माजी सैनिकांनी आपल्या कुटुंबासोबत हजेरी लावली.

मेळाव्या साठी पुणे,सोलापूर, सातारा, सांगली,धुळे या जिल्हातून आणि काही सैनिक सुट्टीवर आले असताना त्यांनी पण मेळाव्यासाठी हजेरी लावली.

कार्यक्रमाची सुरवात सकाळी 11 वाजता दिपप्रज्वलन ने झाली. यानंतर सर्वांनी स्वतःचा परिचय दिला नंतर यामध्ये 2023-24 मध्ये सेवानिवृत्त झालेले सैनिक व सेवानिवृत्त होऊन महाराष्ट्र शासन मध्ये पुनर्नियुक्त झालेले माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. या नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

 सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मध्ये येणाऱ्या अडचणी विषयी माहिती सांगितली. सैनिकांच्या पाल्यांसाठी कोणकोणत्या सवलती आहेत त्याबद्दल माहिती देण्यात आली. आलेल्या सर्वांनी आप आपले मनोगत व्यक्त केले 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष विभुते यांनी केले. तर सर्वांची मते जाणून घेऊन 

कार्यक्रमाचे नियोजन श्री जनार्धन येलपले यांनी केले आणि मेळावा पार पाडण्यासाठी सर्वांनी एकमताने साहाय्य केले.

शेवटी सर्वांनी चहाचा आस्वाद घेऊन स्नेह मेळाव्याची सांगता झाली समारोप होताना यानंतर आपण पुन्हा लवकरच भेटू असा आशावाद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता..

११ जून २०२४

तब्बल २५ वर्षानंतर "टीम गोल्डन १९९८-९९" या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा संपन्न....



सांगोला / समाधान धांडोरे

आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार दि ९ जून रोजी विकास विद्यालय अजनाळे येथे इयत्ता दहावीच्या "टीम गोल्डन १९९८-९९"   बॅचचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. या  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित विकास विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज अजनाळे चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद दादा येलपले, मुख्याध्यापिका  सिंधू  कोळवले ,सहशिक्षक  अप्पाराव धांडोरे , शंकर कोळवले, भिवा बोरकर, परिचारक शंकर लाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टीम गोल्डन १९९८-९९ या बॅचला तब्बल पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या उत्साहात हा स्नेह मेळावा पार पडला प्रत्येक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला जीवन प्रवास सांगितला काहींना बोलताना अश्रू अनावर झाले  या बॅच मधील काही विध्यार्थी आज शिक्षक, सैनिक, उद्योजक, इंजिनियर तर काही शेतकरी झाले यातील मुली ही चांगल्या गृहीणी झाल्या.

 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद  येलपले बोलताना म्हणाले सध्या मुलांपेक्षा मुलींची शिक्षणाची पातळी ही वाढलेली दिसत आहे आणि गुणवत्तेतही मुलींचा समावेश जास्त आहे त्यामुळे मुलांकडे हे आपण विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना शिक्षणामध्ये पुढे घेऊन जावे.

 त्यानंतर मुख्याध्यापिका आणि टीम गोल्डन १९९८-९९ या बॅचच्या वर्गशिक्षिका सिंधू कोळवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ही बॅच शाळेचा 100% निकाल लावणारी पहिलीच बॅच होती त्यामुळे ही बॅच माझ्या आवडती आणि कायम आठवणीत राहील आणि माजी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या

त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी मिळून प्रशालेच्या पटांगणामध्ये वृक्षारोपण केले

सकाळच्या सत्रातील प्रशाले वरचा कार्यक्रम संपवून सांगोला येथील "फाइव स्टार रेस्टॉरंट" येथे माजी विद्यार्थ्यांची मनोगते आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला 

त्या कार्यक्रमास विकास विद्यालय अजनाळे चे माजी मुख्याध्यापक शामराव कोळवले यांना निमंत्रित करण्यात आले होते

 सत्कार समारंभ नंतर बोलताना ते म्हणाले मी हा स्नेह मेळावा पाहून भारावून गेलो 

माझा प्रत्येक विद्यार्थी त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी झालेला पाहून मला फार आनंद झाला

 प्रत्येक मित्र-मैत्रिणीने एकमेकांशी आपुलकीने संवाद साधून आनंद व्यक्त केला 

टीम गोल्डन च्या वतीने डाळिंब व्यापारी हनुमंत पुजारी यांना "टीम गोल्डन जीवनगौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला आणि सर्व सदस्यांना आकर्षक गिफ्ट वस्तू भेट देण्यात आल्या 

तसेच सांगोला शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि गजानन स्टील या उद्योग समूहाचे मालक अशोक यड्रावकर यांनीही सर्व माजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक भेटवस्तू वाटप केल्या 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे भारतीय सैन्य दलातील हवालदार पदी कार्यरत असलेले जनार्दन येलपले यांनी विशेष कष्ट घेतले

 या कार्यक्रमाचा समारोप होताना यानंतर आपण लवकरच भेटू असा आशावाद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता

शेवटी अशोक येड्रावकर यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वांनी चहाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली

०६ फेब्रुवारी २०२४

उदनवाडी चे सुपुत्र अशोक आलदर यांना जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

उदनवाडी तालुका सांगोला येथील सुपुत्र श्री अशोक आलदर यांना नुकताच श्री स्वामी समर्थ जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे

राज्यातून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यामधुन समितीने 22 जणांचे जीवन गौरव पुरस्कार साठी शिफारस केली होती श्री अशोक आलदर हे महावितरण मध्ये नोकरी करत  असून त्यामध्ये श्री अशोक आलदर यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना या अगोदरही महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार व महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे वेगवेगळे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत

तसेच महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या पदावरतीही कार्यरत आहेत त्यांचे कार्य पाहता आताही त्यांना स्वामी समर्थ  जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सांगोला तालुक्याचे आमदार मा शहाजी बापू पाटील दामाजी कारखान्याचे चेअरमन मा शिवानंद पाटील सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा सौ जयमालाताई गायकवाड व पंढरपूरचे युवा नेते प्रवण मुखर्जी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला 

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदचे माजी शिक्षणाधिकारी मा जितेंद्र खंडाळे साहेब प्राध्यापक नाथाजी चौगुले नगरसेवक गुरुदास अभ्यंकर तसेच स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुवर्णाताई खंडागळे सचिव मा संकेत खंडागळे इत्यादी उपस्थित होते.

१० डिसेंबर २०२३

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खांद्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दुर्बिनच्या सहाय्याने यशस्वी : डॉ. धवल आवताडे...


 सांगोला/प्रतिनिधीः

 सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खांद्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दुर्बीणीच्या साह्याने यशस्वी करण्यात आल्याची माहिती वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे प्रसिद्ध आर्थोकेअर तज्ञ एम. एस. आर्थो डॉ.धवल अवताडे यांनी दिली

लोटेवाडी येथील जयश्री सावंत यांच्या खांद्यातील धागे दोन महिन्यापूर्वी तुटले होते खांद्याची हालचाल करताना त्रास होत होता असंख्य वेदना होत होत्या त्यांनी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध आर्थोकेवर तज्ञ  डॉ.धवल  आवताडे यांच्याशी चर्चा करून सर्व तपासण्या करून घेतल्या होत्या डॉ. धवल अवताडे यांनी त्यांना   शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येे हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व शस्त्रक्रिया त्याचबरोबर गुडघ्यांची गादी तुटली असल्यास  त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.

डॉ.धवल अवताडे यांनी त्यांना उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर दुर्बीणदारी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यासह आटपाडी ,जत ,कवठेमहाकाळ, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, आदि भागातील सर्व रुग्णांनी वेदांत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे आर्थोकेअर तज्ञ  डॉ.धवल अवताडे यांच्याशी संपर्क साधावा अशी आवाहन  करण्यातआले आहे.

हाडांचे फ्रॅक्चर, गुडघ्याचे लिगामेंट (गादी) , खुबा बदलणे, गुडघे बदलणे, मणक्यांची नस दबणे मणक्याच्या  शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत इतर कही शस्त्रक्रिया दुर्बीण द्वारे यशस्वीपणे करण्याचा वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत.

१६ मे २०२३

अजनाळे येथील "टीम गोल्डन" १९९८-९९ या दहावीच्या बॅचने २४ वर्षानंतर एकमेकांशी हितगुज साधले...


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

अजनाळे पंचक्रोशी मधील विकास विद्यालय अजनाळे येथील 1998 /99 दहावी बॅच मधील विद्यार्थी 24 वर्षानंतर अखेर 2023 ला एकत्रित आले. सर्वांचं अतिशय आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कसे चार तास निघून गेले कळलेच नाही.

शाळेत शिकत असताना न बोलणारे,आता थेट संवादातून आपलेपणा,आपुलकी शब्दातून नव्हे मनातून जाणवत होती, पुन्हा एकदा ते दिवस आठवले,वेळात वेळ काढून आपण सर्वजण एकत्र जमलो,त्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता, गमती जमती,शाळेतला रोजचा दिवस,खोड्या,सर्व काही क्षणात आठवले... 

सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये जो तो इतका मग्न झाला आहे की तो स्वतःसाठी सुद्धा वेळ देऊ शकत नाही प्रत्येक जण आपापला व्यवसाय, शेती, नोकरी, किंवा व्यापार, यासाठी पुणे- मुंबई किंवा परदेशात राहतात तर काहीजण गावातच शेती करतात आणि काहीजण देश सेवेत (आर्मी/ पोलीस) आहेत .

अशा सर्वांचा एकत्र येण्याचा बऱ्याच दिवसाचा संकल्प १३ मे २०२३ रोजी जुळून आला याप्रसंगी  जनार्धन येलपले, भारत लाडे ,गुणवंत कोळवले ,हरीश लाडे ,चंद्रकांत कोळवले, अरुण कोळवले, संतोष कोळवले , साधू कोळवले, दत्तात्रय येलपले, अशोक एड्रावकर,विजय लोकरे, समाधान धांडोरे, वसंत एरंडे, विश्वास जाधव, सर्जेराव धांडोरे ,सतीश येलपले,हनुमंत चौगुले, हनुमंत पुजारी इत्यादी वर्गमित्र उपस्थित होते

खूप काही गप्पागोष्टी करण्यात आल्या त्यानंतर जेवणाच्या मेजवानीचा एकत्रित आनंद लुटला आणि शेवटी आईस्क्रीम खाण्याचा मोह कोणालाच आवरता आला नाही त्यावेळी लहानपणीच्या १० पैशाच्या गारेगार खाल्लेल्या आठवणी सुद्धा ताज्या झाल्या आणि आणि प्रत्येकाने भेटीचा आनंद व्यक्त केला आणि तीच ऊर्जा घेऊन पुढच्या वर्षी लवकरच भेटू या आशावादाने जो - तो रवाना झाला

१८ एप्रिल २०२३

सांगोला महावितरण मधील अशोक आलदर हे पंढरपूर येथे "नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय कामगार रत्न" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.... .

 



सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

पंढरपूर येथे 14 एप्रिल 2023 रोजी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता त्याचाच एक भाग म्हणून सांगोला महावितरण मधील कर्तव्यदक्ष अधिकारी  श्री अशोक आलदर यांना "नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय कामगार रत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपूर रुक्मिणी मंदिर सहअध्यक्ष, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील ,अभिजीत ढोबळे, डॉ बी पी रोंगे सर, आणि प्रतिष्ठान संस्थापक डी राज सर्वगोड आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले



अशोक आलदर यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार, सीबीसी न्यूज चा कोविड योद्धा पुरस्कार, समाजरत्न ,प्रशासनरत्न ,कोल्हापूर येथे क्रिएटिव हॅडन्स ऑफ महाराष्ट्र ,जळगाव येथे सामाजिक सेवा ,सोलापूर येथे आदर्श कर्मचारी रत्न अशा आज पर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे सांगोला महावितरण चे उप अभियंता श्री आनंद पवार साहेब यांच्या आणि तमाम सांगोला वासियांच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे



०८ नोव्हेंबर २०२२

ग्रामसेविका स्वप्नाली रुपनर यांच्या निधनाने कडलास गावावर शोककळा...


 सांगोला (प्रतिनिधी) :शासकीय काम आटपून सांगोल्याहून घराकडे निघालेल्या ग्रामसेविकेच्या स्कुटीला कंटेनरने ओव्हरटेक करताना धडक दिल्याने स्कुटीवरील ग्रामसेविकेच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास कडलास (ता. सांगोला) येथे घडली आहे.सौ.स्वप्नाली रुपनर (वय 35 वर्षे, रा. कडलास, ता. सांगोला) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळालेल्या महिला ग्रामसेविकेचे नाव आहे.


त्या सध्या बुरंगेवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे माहेर मेडशिंगी व सासर कडलास आहे. अतिशय संघर्षमय जीवन जगून त्यांनी हे सर्व यश प्राप्त केलं होतं. दारे धरण्यापासून, शेतीची सर्व कामे,त्या करायच्या. त्यांचे वडील एस.टी. मेकॅनिक होते. दोन्ही भावांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर त्यांचे पती श्री. अरविंद रुपनर हे कडलास हायस्कूल कडलास येथे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करतात. 


 दत्तनगर येथे 30 ते 35 महिलांचा बचत गट उभा करून 15 लाख रुपयांचा निधी आणण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या होत्या. वाडी व गाव आदर्श करण्याकडे त्यांचा ओढा होता. विविध शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांना संगीताची आवड होती, तबलावादन शिकत होत्या. त्यांच्या निधनाने कडलास, मेडशिंगी बुरंगेवाडी व सांगोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात सासू, पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

       त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार, 9 नोव्हेंबर  रोजी दत्तनगर, कडलास येथे सकाळी आठ वाजता होणार आहे.

०६ नोव्हेंबर २०२२

डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सतीश (भाऊ) सावंत यांना सूर्या भारत फाउंडेशन चा सूर्या भारत राष्ट्रीय पत्रकार प्रदान


 सांगोला/प्रतिनिधी :

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्‍वर येथे झाले. सूर्य दत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्य दत्ता ग्रुप इन्स्टिट्यूट इंडियाचे डॉ.संजय चोरडिया व डॉ.सुषमा चोरडिया यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सतीशभाऊ सावंत यांना प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार सतीशभाऊ सावंत हे दोन दैनिकाचे संपादक आहेत व ते निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात सलग 24 वर्ष निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहेत. पत्रकारितेत त्यांनी सांगोला तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नावलौकिक केला आहे

सक्षमपणे सतीशभाऊ सावंत यांनी दोन दैनिके चालवली असून मोठ्या प्रमाणावर पत्रकार तयार केली आहेत.

सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिक तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. पत्रकारितेत त्यांनी विश्‍वासहर्ता निर्माण केली असून सोशल मीडियामध्ये त्यांचे काम जलद गतीने सुरू आहे सोशल मीडिया त्यांनी प्रभावशाली बनवला आहे.

मेट्रो सिटी पासून खेडेगांवापर्यंत सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणार्‍या पत्रकारांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यातील डिजिटल मीडियामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना एकत्र करून ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली.

सध्या डिजिटल मीडिया मधील सर्व देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उल्लेख होतो वे पोर्टल, युटयुब चैनल व इतर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना योग्य ते न्याय मिळावा व शासनाने याची दखल घ्यावी यासाठी ही संघटना अहोरात्र झटत असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.

संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संयोजन समितीचे सर्व सदस्य सातारा जिल्हाध्यक्ष विकास भोसले सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष शिराळे व नितीन ढापरे यांनी सातारा कंदी पेढे देऊन सतीश भाऊ सावंत यांचा यथोचित सत्कार केला यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे डॉ. संजय चोरडिया यांच्या वतीने सतीश भाऊ सावंत यांना राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले.


चौकट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी डिजिटल मीडियाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्‍वर येथील भिलार या गावांमध्ये घेण्यात आले होते याच पार्श्‍वभूमीवर सांगोला तालुक्याचे सुप्रसिद्ध पत्रकार व डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सतीश(भाऊ)सावंत यांना सूर्याभारत राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सदर पुरस्कार सूर्याभारत फाउंडेशनचे सर्वेसर्वा संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या शुभहस्ते जिल्हाध्यक्ष सावंत यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे सांगोला तालुक्याच्या पत्रकारितेमध्ये व जिल्ह्याच्या पत्रकार क्षेत्रामध्ये एक मानाचा तुरा रोवण्याचे काम सावंत यांच्या माध्यमातून झाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक देखील होत आहे.

३१ ऑक्टोबर २०२२

सांगोला- मिरज रोड जुनोनी येथे भीषण अपघात ! दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना कारने चिरडलं; ७ जणांचा मृत्यू, ८ गंभीर....


 सांगोला:जुनोनी गावाजवळ आज सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते.


अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकऱ्यांना धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत.


दरम्यान, या अपघातात विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांनी आपले प्राण गमावल्याने करवीर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघाले होते. 


मात्र वाटेत सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ चालत असताना आज सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून ८ जणांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.

*आज जुनोनी बायपास रोडला सांयकाळी 7वाजण्याच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या  MH-13-DE-7938 या कारने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत गाडी घुसवली यामुळे 32वारकऱ्यापैकी 7वारकरी जागेवर मुखी पावले.यामध्ये शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार, सर्जैराव जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव हे रा.जाठारवाडी ता.करवीर जि.कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

    यावेळी यांचा मुक्काम जुनोनी गावाच्या जवळ असणाऱ्या श्रीराम वस्तीवर होणार होता. परंतु काळाने घाला घातला व अलीकडे हा अपघात घडला.अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्ताचा व मांसाचा सडा पडला होता. व सर्वत्र रडण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात येत होता.

     या अपघाताची माहिती मिळताच ताबडतोब सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

१८ ऑक्टोबर २०२२

मनसे सांगोला विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते यांच्या अथक प्रयत्नानंतर टँकर चालक यांची बिल आदा; ग्रामीण पाणीपुरवठा यांना पाडले भाग..


 अजनाळे:सन 2018 19 यावर्षी सांगोला तालुक्यातील दुष्काळी स्थिती असताना, तालुक्यात प्रत्येक गावात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याचे काम ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सांगोला या मार्फत पाणीपुरवठा करण्याचा करार हा. मा. बबनरावजी शिंदे सहकारी मोटार वाहतूक संस्था मर्यादित माढा  या संस्थेसोबत केला होता. यानुसार मौजे लोटेवाडी तालुका सांगोला या गावात पाणी पुरवठा करण्याचे काम बबनरावजी शिंदे सहकारी मोटार वाहतूक संस्था मर्यादित माडा यांच्याकडून नंदकुमार दुर्योधन यादव यांनी  केले होते. परंतु अद्याप इतके वर्ष होऊनही टँकर चालकाची बिले न देता सदर प्रकरणात पैशांचा मोठा भ्रष्टाचार करून टँकर चालकांचा बिलांच्या पैशात मोठ्या अफरा त फर केली होती. याबाबत टॅंकरचालक आप्पा धोंडीबा मोरे यांनी आपले थकीत बिल मिळावे म्हणून कायदा तसेच अनेक संस्था व राजकीय व्यक्ती यांची मदत मागितली पण सगळीकडे निराशाच पदरी आल्याने शेवटी ते पैसे बुडाले म्हणून सोडून दिले. परंतु या अन्यायाला वाचा फोडली ती सांगोला विधानसभा मनसे अध्यक्ष अक्षय तानाजी विभुते यांनी.

           सदर प्रकरणात नक्की किती रुपयांचा घोटाळा झाला आहे, यांची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत  मागवली

असता. या प्रकरणात लाखोंचा घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यामुळे सदर टॅंकर चालकास न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदार कार्यालय तसेच पाणीपुरवठा विभाग सांगोला यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली मात्र प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. नंतर सदर प्रकरणात टँकर चालकास न्याय मिळवून देण्यासाठी मनसे सांगोला विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते यांनी दिनांक 15 /9/2022 रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले होते. यानंतर सदर प्रकरणात टँकर चालकचे पैसे देण्याची हमी नंदकुमार दुर्योधन यादव व तहसीलदार यांनी दिली होती. मात्र आंदोलनानंतर या प्रकरणात मनसे सांगोला विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते यांच्यावर मानहानीचे दावे करून त्यांना धमक्या देण्याचे प्रयत्न झाले. पण अशा कोणत्याही धमक्यांना भीक न घालता मोठ्या जिद्दीने आणि धैर्याने अक्षय विभुते यांनी हा लढा चालू ठेवला. जर या प्रकरणात लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास परत नव्याने आंदोलन करण्याचे निश्चित करून आज दिनांक 19/10/2022 रोजी आंदोलन करण्यास तहसीलदार कार्यालयासमोर गेले असता, नंदकुमार दुर्योधन यादव यांनी आपली चूक मान्य करून सदर टँकर चालक आप्पा धोंडिबा मोरे यांचे थकित दीड लाख रुपये परत केले. सदर प्रकरणात माफी मागून आंदोलन न करण्याचे आवाहन केले.

          अखेरीस या प्रकरणात मनसे विधानसभा अध्यक्ष अक्षय तानाजी विभुते यांनी त्या प्रामाणिक टँकर चालकास न्याय मिळवून दिल्याने संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.