मंगळवेढा प्रतिनिधी :येताळा खरबडे
मंगळवेढा दामाजीनगर येथील रणवीरकुमार साहू वय वर्ष ४ या बालकास दिनांक १८/११/२२ रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती . सदर घटनेची फिर्याद बालकाचे वडील मनोजकुमार साहू आणि आई यांनी तात्काळ मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दिली होती परंतु पोलिसांनी कसल्याही प्रकारची कर्तव्यनिष्ठता न दाखवता तपास केला नाही मंगळवेढा येथे यापूर्वी नरबळी सारखे प्रकार घडलेले यांना माहीत होते पोलीस प्रशासन म्हणजे जनसामान्य नागरिकांचे रक्षणकर्ते मानले जातात परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने रक्षण करताना दिसत नाहीत मंगळवेढा परिसरामध्ये महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून मंगळवेढा दामाजी नगर येथील संतप्त महिलांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक सोलापूर, विधानसभा आमदार समाधान अवताडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आदी मान्यवरांना निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले आहे अपहरण झालेल्या निष्पाप बालकाचा तात्काळ तपास करून त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन करा आणि बेजबाबदार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्यावर कारवाई करा अन्यथा मंगळवेढा पोलीस स्टेशनवर सबंध तालुक्यातील महिलांचा व लहान मुलांचा धडक मोर्चा आणि तीव्र आंदोलने केली जातील असा मंगळवेढा येथील महिलांनी इशारा दिला आहे
सदर प्रकरणांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ लक्ष घालून बालकास शोधून आई-वडिलांच्या स्वाधीन करतील का ....? याकडे सर्व मंगळवेढा नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा