मंगळवेढा :प्रतिनिधी :
आज 6 सप्टेंबर रोजी मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना करमाळा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या ठिकाणी तालुक्यातील जनतेला भेडसावत असणारे प्रश्न, समस्या बच्चु भाऊ समोर मांडण्यात आल्या. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी मंगळवेढा तालुक्यातील पी एम किसान योजनेचे संदर्भातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी, चाळीसगावचा पाण्याचा प्रश्न, तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार तसेच बोगस डॉक्टर यांच्यवर्ती कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर मंगळवेढा नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी शहरातील समस्यांकडे केलेले दुर्लक्ष
रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय,लाईट,नगरपालिका शाळेतील स्वच्छ्ता असेल.
तसेच इतर ही प्रश्न, समस्या मांडण्यात आल्या यावरती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संबंधित प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली
यावेळी
पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी तालुका संपर्कप्रमुख तानाजी माने तालुका उपाध्यक्ष सुभाष सलगर, चेतन वाघमोडे, दत्ता पाटील विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा