सांगोला/विकास गंगणे
मो.9881583935
सन १८५७ च्या ऊठावा अगोदर ही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे आद्यक्रांतीकारक नरवीर ठरले गेले , ते म्हणजे राजे उमाजी नाईक ७ सप्टेंबर हा आद्यक्रांतीकारकचा जन्मदिन.
डिकसळ ग्रामपंचायतीच्या वतीने आद्यक्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
उपसरपंच रणजित गंगणे यांनी मनोगत व्यक्त केले आणि उमाजी नाईक यांची थोडक्यात माहिती सांगितली. ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब निळे यांच्या हस्ते आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून ,पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी नरवीर उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मंडले, नवनाथ मंडले, ज्ञानेश्वर चव्हाण, तुषार शिवशरण ,भाऊसाहेब गेजगे, साहेबराव इंगोले, शिवाजी पवार,अजित गंगणे,धीरज गौड, गौतम गंगणे, बाळू गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ आदी.उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा