Breaking News

छ. शाहू महाराजांचा वैचारिक वसा व वारसा आजच्या विद्यार्थ्यांनी जोपासणे आवश्यक- अनसर शेख....! महाराष्ट्रातील नामांकित सारथी संस्थेमार्फत जतचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी शेख यांचा गुणगौरव संपन्न...!!



नाझरे प्रतिनिधी


          छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी,पुणे या संस्थेमार्फत कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त सन 2022/23 या वर्षात छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धांमध्ये जत  आणि आटपाडी तालुका या दोन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन या तालुक्यातील मुलांना जास्तीत जास्त पारितोषिके आणि प्राविण्य प्राप्त करून दिल्याबद्दल सारथी या संस्थेमार्फत तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अन्सार शेख व दत्तात्रय मोरे यांचा कोल्हापूर या ठिकाणी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि सन्मानवस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे कोल्हापूर विभागातील फक्त नऊ गटशिक्षणाधिकारी यांचा सन्मान करण्यात आलेला होता त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील त्या दोघांचा सन्मान करण्यात आलेला आहे. 


 
शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त निबंध स्पर्धेत जत तालुक्यातील सर्वाधिक निबंध यावेळी घेण्यात आले यासाठी तत्कालीन गट शिक्षणाधिकारी शेख सो यांचे उत्तम नियोजन व मार्गदर्शन या कामी आले ‌. विद्यार्थ्यांना प्रेरित करणे मार्गदर्शन देणे आणि उपक्रमांना योग्य दिशा देऊन ते यशस्वीरित्या त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये शेख यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. प्रत्येक कामात योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन व योग्य अंमलबजावणी आजतागायत अविरतपणे शेख यांच्याकडून सुरू आहे व यासाठी त्यांची एक विशेष ओळख देखील निर्माण झाली आहे याचे फलित म्हणून त्यांचा सारथी संस्थेतर्फे हा गुणगौरव करण्यात आला. 

यावेळी मनोगतात बोलताना, हे यश केवळ एकट्याचे नसून यामागे खूप शिक्षकांचे श्रम योगदान व विद्यार्थ्यांची मेहनत असून हा या सर्व घटकांचा केलेला गुणगौरव आहे तसेच आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा वैचारिक वसा व वारसा जोपासणे व अंगीकारणे आवश्यक असून येणारे भविष्य उज्वल होण्यासाठी या महामानवांचे विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे यावेळी बोलताना शेख यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत