Breaking News

०७ जून २०२५

दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू - डॉ. सचिन गवळी


सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला शहरातील कडलास नाका येथील दिशा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून याचा लाभ गरजू रुग्णांनी  घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे, जी राज्यातील सर्व कुटुंबांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा पुरवते. या योजनेत, प्रति कुटुंब प्रति वर्षी 5 लाख आरोग्य संरक्षण, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत  5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. ही योजना सर्वसमावेशक असून, विविध प्रकारच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवा यांमध्ये मदत करते. 

       यावेळी डॉ. सचिन गवळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासूनच मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू असून या  योजनेअंतर्गत सांधा रोपण शस्त्रक्रिया साठी निधी, सर्व मेडिक्लेम कॅशलेस सुविधा असून या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या फॅक्चर, अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर,

आर्थोस्कोपी (खांदा, गुडघा निसटणे उपचार) प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया (T.H.R.,T.K.R.) स्पइन सर्जरी, जबड्याची शस्त्रक्रिया, मणक्याचे सर्व आजाराचे निदान व उपचार केले जातात असेही सांगितले


 

०६ जून २०२५

सदाशिवनगर ग्रामपंचायत ला सलग तिसऱ्यांदा LIC बिमा ग्राम पुरस्कार...! आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार...!!


 सदाशिवनगर प्रतिनिधी :हुसेन मुलाणी

 LIC विमा प्रतिनिधी सागर उरवणे यांची माहिती

विमा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC यांचा बिमा ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत सदाशिवनगर ला नुकताच जाहीर झाला आहे. गावातील लोकांना विम्याचे महत्त्व पटवून देऊन मागील आर्थिक वर्षात सदाशिवनगर या गावातून सुमारे 125 लोकांना विम्याचे छत्र प्रदान करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून हा पुरस्कार  सदाशिवनगर ग्रामपंचायतला मिळत आहे. लवकरच या पुस्तकाराचे वितरण माननीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


गावच्या विकासासाठी 

 एक लाख रुपये बक्षीस आणि बिमा  ग्राम पुरस्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी विकास अधिकारी शशिकांत निकम साहेब, तसेच अनोकार साहेब, आणि पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी श्री गुळवणी साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

०५ जून २०२५

पर्यावरण दिनानिमित्त पायोनियर पब्लिक स्कूल य.मंगेवाडी मध्ये वृक्षारोपण


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन पायोनिअर पब्लिक स्कूल (CBSE) मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेच्या परिसरात ५१ झाडांची लागवड करण्यात आली.

    कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर यांच्या हस्ते झाला. प्रिन्सिपल श्री सतीश देवमारे सरांनीही वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

    कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेच्या कर्मचारी वर्गाने खड्डे खोदणे, झाडांना पाणी देणे आणि व्यवस्था सांभाळण्यात मोलाचे सहकार्य केले.

    वृक्षारोपणासोबत झाडांची निगा तितकीच महत्त्वाची आहे. फक्त झाडे लावून पर्यावरण दिन साजरा होत नाही, तर त्या झाडांची नियमित देखभाल करून ती वाढवणे हेच खरे पर्यावरण रक्षण आहे. याच उद्देशाने शाळेने झाडांच्या संरक्षणाची जबाबदारीही विद्यार्थ्यांना दिली आहे.

 “झाडे लावा – जीवन वाचवा” या घोषवाक्याला कृतीची जोड देत शाळेने पर्यावरणपूरक उपक्रमांची सुंदर सुरुवात केली.

०४ जून २०२५

शक्तीपीठ रद्द करा... - नाझरे, वझरे येथील शेतकऱ्याची एक मुखी मागणी..


 नाझरे प्रतिनिधी 

      नाझरे, वझरे ता. सांगोला येथील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक नाझरे येथील खंडोबा मंदिर वझरे येथील अंबाबाई मंदिर येथे संपन्न झाली व यामध्ये एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशा घोषणा देऊन, शक्तीपीठ रद्द करा अशी एक मुखी मागणी करण्यात आली.     

शक्तीपीठ महामार्गासाठी येथील कसदार जमिनी जाणार आहेत व जमिन आमची आई आहे व आईस आम्ही विकणार नाही तसेच यावर आमची रोजी रोटी आहे, जमिनी देऊन आम्ही खायचे काय असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहे व शक्तिपीठासाठी नाझरे येथून चार किमी अंतरावर समांतर रोड असताना हा नवीन रोड काढून ठेकेदारांना जगण्याचा महाराष्ट्र शासनाचा हेतू चांगला नाही व या अगोदरच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रोड होणार नाही असे सांगितले परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी व शासनाने शेतकऱ्यांचा विरोध असताना हा मार्ग रेटण्याची गरज काय आहे व यासाठी मोजणी येणाऱ्या अधिकाऱ्याला आम्ही येऊ देणार नाही व मोजू देणार नाही असा ठराव बैठकीत करण्यात आला. 

     यावेळी डॉक्टर सोनवणे, शिक्षक नेते दादासो वाघमोडे, हरिश्चंद्र बनसोडे, दत्तात्रय पाटील, गंगाधर जोंधळे, रविराज शेटे व माजी सरपंच विजयकुमार देशमुख, राजू पाटील, दत्ता देशपांडे भारत बनसोडे यांनी हा मार्ग सरकारने रद्द करावा असे यावेळी सांगितले. 

     तसेच हजारो एकर सुपीक जमिनी, विहिरी, पाईपलाईन, बोरवेल, फळबागा, घरे, बंगले यांना फटका बसणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा व शक्तिपीठ रद्द करावा तसेच शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका व कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ होऊ देणार नाही असा पवित्रा नाझरे व वजरे येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. यावेळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे कान कात्रे मायणी येथे प्रबोधन


 नाझरे प्रतिनिधी 

         श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे. 

      जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व यासाठी कानकात्रे विठ्ठल नगर मायणी येथे रविवार दिनांक 8 जून रोजी सायंकाळी पाच वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. 

       सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आवाहन किशोर सूर्यवंशी, दादा चव्हाण, हनुमंत सावंत, दत्तात्रय सावंत, अमोल चव्हाण यांनी केले आहे. 

      तसेच गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी यासाठी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे स्वामी भक्त अमोल चव्हाण, सागर जाधव, कृष्णा निकम, महेश जाधव यांनी आवाहन केले आहे.


०३ जून २०२५

वीरभद्र मंदिर नाझरे येथे कोळेकर महास्वामी यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न...

नाझरे प्रतिनिधी 

       गुरु एक तोचि माझा 

        विधाता अचल...

     ‌‍.  गुरुविना सुने सारे 

        विश्व हे सकल..

   श्री गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे विरभद्र मंदिर नाझरे ता . सांगोला येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महास्वामीच्या प्रतिमेचे पूजन रविराज शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

      यावेळी वीरशैव महिला भजनी मंडळाचे भजन तसेच महा आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. सदर प्रसंगी अशोक पाटील गुरुजी, रविराज स्वामी, संजय रायचुरे, शरद स्वामी, रमेश शिरदाळे, बाळासो स्वामी, दीपक शिरदाळे, शंकर स्वामी,महालिंग पाटील, मुकुंद पाटील, दिलीप शिरदाळे, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, पंचाक्षरी स्वामी, शिवया स्वामी, शिवाजी स्वामी, महिलावर्ग, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. पुरोहित म्हणून रविराज स्वामी यांनी काम पाहिले.

०२ जून २०२५

लिंगैक्य कोळेकर महास्वामींचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा कोळे मठात संपन्न...


नाझरे प्रतिनिधी 

        गुरु म्हणजे आहे काशी 

       सर्व तीर्थे तया पाशी 

        तुका म्हणे ऐसे गुरु 

         चरण त्यांचे ह्रदय धरू 

        गुरुविण न मिळे ज्ञान 

  ज्ञानवीन न होई जगी सन्मान 

  जीवन भव सागर तराया 

   चला वंदू गुरुराया.....

याप्रमाणे लिंगैक्य रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गुरु गादी मठ कोळे ता. सांगोला येथे महास्वामीच्या दर्शनासाठी भक्तगणांचा महापूर दिसत होता. व प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे गुरुमुर्ती निर्वाण रुद्र पशुपती महास्वामीजी 31 पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध आयोजन केले होते. यावेळी धर्मरत्न गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी चिटगुपा व महादेव महाराज प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीस गुरुवर निष्ठा ठेवा व नामस्मरण करा, आपल्या अनंत अडचणीत गुरु मार्ग काढत असतो यासाठी गुरु महत्त्वाचे आहेत असे शिवभक्त हनुमंत कोरे महाराज यांनी यावेळी सांगितले.   

 गुरु हा आपल्या भक्तांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे व अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखवतो तसेच अनेक संकटातून तारणहार करणारा गुरुच असतो म्हणून प्रत्येकाने गुरुच्या उपदेशाचे पालन करा व गुरु शिष्याचे नाते अतूट बनवा असे 31 वे पिठाधिपती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामिनी आपल्या आशीर्वाचनात सांगितले ‌. तर गुरुची सेवा मनोभावे करा व अनेक वर्षापासून गुरुपरंपरे च्या गादीचा मान आहे, व यासाठी जीवनात जीवमान असेपर्यंत गुरुची सेवा करा असे महादेव महाराज हिंगणगाव यांनी सांगितले. दुपारी बारा वाजता श्री ची पुष्प वस्ती संपन्न झाली. त्यानंतर सौ व श्री दीपक तेली यांच्या शुभहस्ते महा आरती संपन्न झाली तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला. महास्वामींचे दर्शन घेण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, युवा नेते यश राजे साळुंखे पाटील, महिला, भक्तगण लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.