Breaking News

०४ जून २०२३

नांदेडच्या अक्षय भालेराव खून प्रकरणी एनडीएमजे चे राज्यसचिव वैभव गीते यांनी दिले सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.... आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.. अशी केली मागणी....


 


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क


नांदेडच्या अक्षय भालेराव यांच्या हत्येचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटले

सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन योग्य कार्यवाहीसाठी तत्काळ शासनास पाठवले 

आज दिनांक 3 जून 2023 रोजी सोलापूरचे मा. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे साहेब पालखी महामार्गाचा आढावा घेण्याकरिता माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता अकलूज विश्रामगृह येथे प्रशासकीय विभागाचा आढावा घेत असताना  राष्ट्रीय दलित न्याय आंदोलनाचे राज्यसचिव वैभव गीते यांनी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर केले.या निवेदनात नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक 01 जून 2023 रोजी मौजे बोंढार ता.जि.नांदेड या गावी डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक शहीद अक्षय भालेराव यांचा  निर्घृण हत्या  करण्यात आली होती .या प्रकरणातील आरोपींवर  कडक कारवाई करून फाशी होण्यासाठी NDMJ संघटनेतर्फे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.या मागणी सोबत च सोलापूर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करावीत .सर्व जाती धर्माच्या नागरिकांची घरकुले माघारी जाऊ नयेत म्हणून निवासी अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांच्या निवासी अतक्रमनित जागा घरकुल बांधण्यासाठी देण्यात याव्यात व  त्या नियमानुकुल करण्यात याव्यात.गायरानात राहणाऱ्या नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.परंतु जोपर्यंत गायरान जागेवरील अतिक्रमन धारकांचे 

पर्यायी जागा देऊन पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कोणत्याही घरास हात लावू नये.याबाबतचे निवेदन मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांना भेऊन देण्यात आले. डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक शहीद अक्षय भालेराव यांचा निर्घृण करण्यात आला.याबाबत काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्या मागण्या पुढीप्रमाणे आहेत -

 डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक शहीद अक्षय भालेराव याचा निर्घृण खून करण्यात आला. मयत अक्षय भालेराव यांच्यावर झालेल्या जातीय  अत्याचारातून खून झालेली फिर्याद त्यांनी नांदेड ता . जी. नांदेड ग्रामीण  पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने दिनांक 02 जून 2023,  गु.र.नं. 392/2023 नुसार व  अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 सुधारित अधिनियम 2015कलम 3(1)r, 3(1)s ,3(2)va.  ,IPC  143, 147, 148, 149, 302,307,324,323,294,504,506,34 व शस्त्र अधिनियम 1959 कलम 4,25,27 नुसार गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेड ग्रामीण हे तपास करीत आहेत. 


1).  आरोपींची व लग्नाची वरातीमध्ये सामील असणाऱ्या इतर लोकांची ब्रेन मॅपिंग चाचणी,नार्को टेस्ट ,लाइ डिटेक्टर  व इतर चाचण्या कराव्यात,व विहित व योग्य पद्धतीने तांत्रिक पुरावा पुढे आणावा.व आरोपीस जास्तीत जास्त फाशी चीच शिक्षा होईल असे सर्व परस्थितीजण्य पुरावे दोषारोप पत्रात समाविष्ट करावेत.

2). या गुन्ह्यामध्ये हा खुनाचा प्रकार असून त्यामध्ये भा. दं.वी. कलम 302, 307 असल्यामुळे अनुसूचित जाती जमाती कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 तील कलम 3(2)5 हे कलम लावण्यात यावे . सदर कलमाला जन्मठेप ते देहदंडाची शिक्षा आहे.ते कलम या फिर्यादी मध्ये नाही,त्याचा फायदा आरोपींना जामीन घेण्यासाठी होऊ शकतो.त्यामुळे अट्रोसिटी ॲक्टचे कलम 3(2)5 हे वाढवण्यात यावे.

3) सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अट्रोसिटी कायद्याच्या नियमानुसार दोन महिन्यात निकाली काढावेत.

4) गुन्ह्याचा सर्व तपास अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 तील कलम 15A तील sub section 10 नुसार व विशेष पोलीस (ना.ह.सं.) महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या परिपत्रका नुसार व्हिडिओ रेकॉर्डिंग  करावा.

5)  मयत अक्षय भालेराव  यांच्या खुनाचा कट कोठे करण्यात आला? त्यामधे कोण कोण सामील होते? याची सखोल चौकशी करून  त्यामध्ये कट केलेबाबतचे भा.दं. वि. कलम 120 B हे लावण्यात यावे.

6) सदर खून प्रकरणातील फिर्यादी व साक्षीदार यांना केस संपेपर्यंत पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.

7) मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाचे जमीन,नोकरी,पेन्शन देऊन पुनर्वसन करण्यात यावे.

8) फिर्यादी व इतर पिडीत याचे जातीचे दाखले तसेच सर्व आरोपींचे जात नमूद असल्याचे जातीचे दाखले,सक्षम प्राधिकरण यांच्याकडून जात नमूद असल्याचे इतर पुरावे दोषारोप पत्रात समाविष्ट करावेत . 

9)  तपासी अधिकारी यांनी तपासासाठी रवाना होताना,पंचनामे करताना,मुद्देमाल रासायनिक विशलेषना करिता पाठवताना पोलिस स्टशनमध्ये स्टेशन डायरी करूनच इतर कार्यवाही करावी . मुद्देमाल रासायनिक विशलेषनाकरिता घेऊन जाणाऱ्या पोलिस अधिकारी,कर्मचारी यांचे जबाब दोषारोप पत्रात समाविष्ट करावेत.

10) मा.पोलीस महासंचालक व मा.अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य यांनी तापसाबाबत दिलेल्या सर्व सूचनांची ,परिपत्रकांची अंमलबजावणी करावी.

11) फिर्यादी व साक्षीदारांचे crpc 164 नुसार मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जबाब घ्यावेत.

12) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 तील कलम 7(2) नुसार सर्व आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी  मे.विशेष न्यायालयात अहवाल पाठवण्यात यावा.

13) घटना गंभीर स्वरूपाची असल्याने गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार गुन्ह्याचा जलद अहवाल सर्व कागदपत्रांसह राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुणे,दिल्ली व राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांना पाठवावा .

14) पोलीस महासंचालक यांच्या करिता विशेष पोलीस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण) महाराष्ट्र राज्य) यांच्या 1 सप्टेंबर 2018 च्या परिपत्रकानुसार दोषरोपत्र  मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी परीक्षेत्रीय पोलीस अधीक्षक ( नागरी हक्क संरक्षण ) यांच्याकडे दोषरोप पत्राची गुणवत्ता तपासण्यासाठी पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषरोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.

15) मा.जिल्हाधिकारी यांनी   जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती ची तातडीने बैठक बोलावून यावर प्रकरणाची सखोल चर्चा करून तपासाची अद्ययावत माहिती घेऊन,तपासामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये याची दक्षता घेण्यात यावी.

16)  उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आरोपींनी जामीन मांडल्यावर प्रत्येक तारखेस तपासी अधिकारी या नात्याने सर्व कागदपत्रे घेऊन मे. कोर्टात हजर राहून बाजू मांडावी.आरोपींच्या जामीनाच्या सुनावणीच्या वेळेस कनिष्ट दर्जाचे कर्मचारी उपस्थित राहतात त्यामुळे आरोपींना जामीन मिळून जातात. त्यामुळे तपासातील खरी वस्तु स्थिती मे.न्यायालयाच्या समोर येत नाही.


17) गुन्हा दाखल झालेनंतर मा.अधीक्षक यांचा तपासाबाबतचा आदेश दोषरोप पत्रात समाविष्ट करावा.

18) मा.जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी घटना स्थळी भेटी देव्यात.

19) सदर खटल्यात अट्रोसिटीचे खटले हाताळण्याचा अनुभव असणाऱ्या वरिष्ठ विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करण्यात यावी.

20) सदर खून खटल्यातील  पीडितांना शासकीय नियमानुसार आर्थिक अनुदान मंजूर करण्यात यावे व या मदती व्यतिरिक्त मा.तहसीलदार यांनी अधिक आर्थिक साहाय्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन दिल्ली यांना प्रस्ताव पाठवण्यात यावा.

21) गुन्ह्याच्या तपासाबाबत मा.पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण) नांदेड परिक्षेत्र ,यांनी दिलेल्या लेखी सूचना दोषारोप पत्रात समाविष्ट कराव्यात.

22)  फिर्यादी व साक्षीदार यांच्याबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्येकास खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे.

23) दोषरोपपत्रात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून सर्व प्रकारची काळजी घ्यावी.

2४)  हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे व गुन्ह्याचा परिणाम समाजमाध्यमांवर पडला असून जनतेचा कायद्यावरील विश्वास वाढवण्यासाठी आरोपीस जामीन मिळू नये म्हणून तपासी अधिकारी यांनी स्वतः मे.विशेष न्यायालयात फिर्यादीची बाजू मांडण्यासाठी  उपस्थित राहावे. 

25) गुन्ह्यातील तपासाची प्रगती पाहण्यासाठी नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस पथकाने घटनास्थळी दुबार भेट देऊन तपासी अधिकारी यांच्याकडून अहवाल घ्यावा.

वरील सर्व कायदेशीर मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाईल. अशा आशयाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे साहेब यांना भेटून देण्यात आले. यावेळी  मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सोलापूर जिल्हयातील प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल व नांदेड येथील अत्याचाराचे निवेदन योग्य कार्यवाहीसाठी शासनास त्वरित पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.निवेदना वरती adv.केवल उके राज्य महा सचिव NDMJ ,वैभव तानाजी गीते राज्य सचिव, पंचशीला कुंभारकर राज्य महिला संघटक जगदिप दीपके मराठवाडा अध्यक्ष यांच्या सह्या आहेत.निवेदन देते वेळेस  नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस चे राज्य सचिव वैभवजी गीते साहेब ,नवनाथ भागवत,आशिष धांडोरे,प्रणव भागवत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा