प्रतिनिधी - संतोष कदम.
औरंगाबाद - नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील अक्षय भालेराव यांचा जातीय वादातून निर्घृण खून करण्यात आला आहे या घटनेचा वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे या खटल्यातील सर्व 16 आरोपी अटक आहे परंतु हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, आरोपीची संपत्ती जप्त करण्यात यावी.आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत करण्यात आली नसता वंचित बहुजन आघाडी संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी महाराष्ट्राचे युवा नेते अमितभाऊ भुईगळ, मराठवाडा सचिव तय्यब जफर,पश्चिम जिल्हा अध्यक्ष. योगेश बन, युवा जिल्हा अध्यक्ष, सतिष गायकवाड, महिला आघाडी अध्यक्ष, लताताई बमणे, जिल्हा उपाध्यक्ष, रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव, के के जगताप, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे,जिल्हा महासचिव भैय्यासाहेब जाधव, जिल्हा महासचिव शाम भारसाखळे, जिल्हा उपाध्यक्ष .जावेद पटेल, जिल्हा सहसचिव, प्रभाकर ढोले .जिल्हा उपाध्यक्ष, रामदास वाघमारे,, जिल्हा सहसंघटक, राजु पगडे, जिल्हा उपाध्यक्ष रविकांत तायडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावी गवई, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, गंगापूर तालुका अध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, खुलताबाद तालुकाध्यक्ष मुक्तार पठाण, युवा मध्य शहर अध्यक्ष संदीप जाधव, पी के दाभाडे,पंडितराव तुपे, वैजापूर तालुका अध्यक्ष सिध्दार्थ तेजाड, संतोष जाधव,कान्हू भालेराव, सचिन भुजंग, दिलीप आरक,हानिफ पटेल, आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा