विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर (ता.इंदापुर) येथील मेन काॅलनीतील जी-२ येथे रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी गाडीला आग लावून जाळण्यात आली. ही घटना
वालचंदनगर येथील पत्रकार प्रतापसिंग उर्फ अमोल राजपूत यांची घरा समोर लावलेली दुचाकी क्रमांक एम.एच.४२ ए.यु. ०३७७ या टी.व्ही.एस.कंपनीच्या ज्युपेटर गाडीला आग लावून पेटवून देण्यात आली आहे.
वालचंदनगर येथील मेन काॅलनीतील जी-२ येथे राहत असलेल्या राजपूत यांनी संध्याकाळी सदरील दुचाकी घरा समोर लावली होती.रात्री १२:३० वाजेपर्यंत दुचाकी घरा समोरच होती.मात्र मध्यरात्री ०२:३० वाजण्याच्या सुमारास राजपूत यांच्या पत्नी लहान मुलीला पाणी पाजण्यासाठी उठल्या असता घरासमोर आग लागल्याचे निदर्शनास आले हि बाब त्यांनी अमोल राजपूत यांना सांगीतल्या नंतर बाहेर येऊन पाहिले असता अज्ञात इसमाने त्यांच्या दुचाकीला आग लागल्याचे दिसले. सदरील आग पाणी टाकून विझवण्यात आली मात्र तोपर्यंत गाडीचे जळुन मोठे नुकसान झाले होते.
या विषयी वालचंदनगर पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम ४३५ अंतर्गत दिनांक २१.०५.२०२४ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक महेश एम. पवार करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा