विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
पुणे :- फुशारकी करणाऱ्या लोकांच्या चळवळी वाढल्या
म्हणून तर
सच्च्या कार्यकर्त्यांच्या चळवळी मोडल्या असे प्रतिपादन
संस्था चळवळ विषयींची भावना कविसंमेलनाचे अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कविवर्य अनंत कदम यांनी व्यक्त केली.
राममनोहर लोहिया उद्यान हडपसर पुणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी आयोजित केले होते.
अनंत कदम पुढे म्हणाले. साहित्य सम्राट ही संस्था गेली अनेक वर्षे साहित्य चळवळ राबवत आहे. त्यामुळे अनेक साहित्यिक ग्रामीण,शहरी, नवोदितांना खुले विचारपीठ सहजच मिळत आहे. अशी चळवळ चालवताना कुणासाठी थांबू नये. नाही तर उशिरा येणारे भाव खाऊन जातात. त्यांचेच फोटो प्रसिद्ध होतात. या कविसंमेलनास अनेक दिग्गज कवी कवयित्री यांनी बागेतील काव्य रसिकांची मने जिंकली. सहभागी झालेल्या कवीमध्ये डॉ. पांडुरंग बाणखेले यांच्या विनोदी कवितेनंतर कविता काळे यांच्या
करायचाच असेल वार तर छातीत कर,
पाठीत नाही.पाठीत वार करणे लढवय्याचा धर्म नाही.
या कविताने दाद मिळवली.
पुढे संजय भोरे यांनी प्रेम हूरहूर विषयावर
जीवाची हूर हूर लावून घेत होतो.
होईल का माझ्या आयुष्याशी
तुझी दोरी बळकट याचाच घोर लावून बसलो होतो.
रचना सादर केली
त्यानंतर विनोदी कवी देवेंद्र गावंडे यांनी ढेकूण ही रचना सादर केली. रसिक कवीला हास्याची मेजवानी दिली ते म्हणाले,
छान झोपलो होतो मी डोळे मिटून
आली माझ्यावर ही बला कुठून.
उठलो झोपेतून खळबळून.
असाच राहील रातभर बसुन,
पाठीला माझ्या चावल ढेकूण!
ही विनोदी कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रल्हाद शिंदे यांनी
गोऱ्या तुझ्या रुपाला भाळतात साले!
अन् रंग यौवणाचे ते न्ह्याळतात साले !
अशी गझल सादर केली. लगेचच तानाजी शिंदे यांनी खाजगी नोकरीतील वास्तव कवितेतून आपली व्यथा मांडली .
खाजगी नोकरीत पिळवणूक
चुकत नाही कधी कुणाला,
नोकरी करावीच लागते शेवटी
मारून तुमच्या मनाला !
ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी रूपवती रचना सादर केली.
ते म्हणाले,
तुह्या रूपाची चांदणी जशी नभी लकाकते ,
धुंद करूनिया अवनीला हळूच ग खुणावते !
प्रेमभाव कविता सादर केली.
लोककवी सीताराम नरके यांनी,
जीवघेणी प्रेयसी ही रचना सादर केली ते म्हणतात,
खुळ खुळा झाला तुझा ,रोज नवी कहानी,
किती गाळशील येड्या,तुझ्या डोळ्यातुन पाणी!
ही रचना प्रियकराला प्रेमात सल्ला देणारी कविता सादर केली. संस्थेचे अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी स्त्री जीवनाचा महिमा सांगणारी काव्य रचना सादर केली.
सागरापरी माया असावी हे वाचले,
स्त्री तुझ्या मायेने ते शब्द खचले.
रानकवी जगदीप वनशिव यांनी
डोळे रचना सादर केली.
येता जाता तुला पाहवया आतुरले हे डोळे!
तू येणाऱ्या वाटेवर अंथरले हे डोळे !
प्रेमाच विलक्षण वेड असणारा प्रियकराची व्यथा मांडताना दिसते .
अशा नवरसाच्या विषयावर काव्य रचनांना सादर करूनी काव्य रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उस्फुर्त दाद दिली. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून प्रकट झाले कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद अष्टुळ यांनी तर आभार सीताराम नरके यांनी व्यक्त केले.
अशा प्रकारे पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलन संपन्न झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा