विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर : ( ता. इंदापूर ) २८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये वालचंदनगर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस नाईक सतीश फुलारे यांनी केले, यावेळी मा. सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. व माहिती अधिकार कायदा लोकहितासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो यावर आपले मत व्यक्त केले.
यावेळी इंदापूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते वैभव धाईंजे यांनी माहिती अधिकार कायद्याबद्दल मार्गदर्शन केले . कायदा स्थापन कसा झाला व हा कायदा स्थापन होण्यापूर्वीची परिस्थिती लोकांसमोर मांडली. माहितीचा अधिकार कायदा हा किती व्यापक आणि लोकांना त्यांचे हक्क कशाप्रकारे मिळवून देतो. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक मध्ये सांगितल्या प्रमाणे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम या नात्याने भारत देशातील सर्व नागरिकांना हा अधिकार आहे. की तो कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयातून माहिती मागू शकतो.
दरवर्षी लोकांमध्ये जनजागृती होऊन, हा कायदा सर्वसामान्यांना शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ज्या ज्या पद्धतीमध्ये कार्य चालते ,योजना काय आहेत. व जनतेच्या कल्याणासाठी शासनाकडून आलेले अनुदान, निधी कुठे व कसा खर्च झाला याची माहिती घेण्याचा अधिकार भारत देशातील सर्व नागरिकांना आहे.
या कायद्याचा उपयोग लोकहितासाठी करण्यात यावा. असे मत वैभव धाईंजे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले .
यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार मा. सतिश फुलारे साहेब यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा