प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) दरवर्षीप्रमाणे विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका नलिनी गायकवाड व कलाशिक्षक अतुल गायकवाड यांचे ,"पर्यावरण वाचवा " या संबंधी अनेक उपक्रम असतात .
या ही वर्षाची सुरुवात ही श्री व सौ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी सध्या होत चाललेला पर्यावरणाचा -हास ,वाढते प्रदूषण ,ऑक्सिजन ची कमतरता आणि वाढती जंगलतोड याची जाणीव ठेवून वृक्षारोपण केले. यावेळी सदर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व थोडक्यात सांगितले. फक्त वृक्षारोपण करून थांबणार नाही तर त्या झाडांची वर्षभर निगा राखणार अशी प्रतिज्ञा केली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार सर ,उपप्राचार्य अरुण निकम सर ,पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे सर ,प्राध्यापिका राजलक्ष्मी दळवी मॅडम, अपर्णा चौधरी मॅडम उपस्थित होत्या.तसेच शाळेतील शिपाई विशाल आणि महेश यांनीही मुलांना झाडे लावताना मदत केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा