Breaking News

०८ मे २०२३

जैविक व सेंद्रिय शेतीतून लोकांचे जिवनमान उंचावण्यास मदत- खा - शरद पवार


 सांगोला (तालुका प्रतिनिधी): दुष्काळी तालुका म्हणून सांगोल्याची ओळख असली तरी शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करून शेतीत प्रगती केली आहे.  तालुक्यातील शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करून डाळिंबाचे साम्राज्य निर्माण करून युरोप, अमेरिकेत डाळिंबाची निर्यात केली. संकटावर मात करून शेती क्षेत्रात यशस्वी होतो येते. यात सांगोला तालुक्याचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल. शेतीच्या आरोग्यासाठी माती, पाणी, पान, फुल, देठ, परिक्षणाची गरज असून यामुळे अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असलेली सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करून शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थक्रांती करण्यासाठी दर्जेदार प्रयोगशाळा उपयुक्त होणार आहे. आज उत्तम शेतीसाठी संशोधन व निष्कर्ष याची अत्यंत गरज असून शास्त्रशुद्ध उत्तम शेतीसाठी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. आधुनिक पद्धतीने जैविक व सेंद्रिय शेती केल्याने लोकांचे जीवनमान उंचावले. सांगोला तालुक्यात कृषी विज्ञान केंद्र मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी दिले.

          मेडशिंगी ता.सांगोला येथे जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्स् ॲग्रीकल्चर रिसर्च व ॲनॅलॅटीकल सेंटरचे उद्घाटन खा.शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील, रमेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, लतिफ तांबोळी, राजकुमार पवार, पियूषदादा साळुंखे पाटील, शेकापचे सचिन देशमुख, अनिल इंगवले, एम.के.देशमुख,  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

       यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री असताना खासदार शरद पवारांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड योजनेचा कार्यक्रम राबविला. त्यानंतर  शेतकऱ्यांच्या क्रांतीला सुरुवात झाली. दिवसांत १८ तास काम करणारा शेतकऱ्यांचा जाणता राजा खा.शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर येण्यासाठी कायम तत्पर असतात. तेल्या व मर रोगाने डाळिंबाच्या बागा उध्वस्त झाल्याने २ ते ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.प्रशांत तेली यांनी प्रास्ताविक केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.रमेश इंगवले पाटील, डॉ.प्रशांत तेली, डॉ.रश्मी हेगडे तेली, चेअरमन अजयसिंह इंगवले, विजयकुमार इंगवले, संजय इंगवले यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा