Breaking News

११ जानेवारी २०२३

श्री वर्धमान विद्यालयाचे ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले तर २१ विद्यार्थी झाले पात्र


 प्रतिनिधी - संतोष कदम.

  वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) दरवर्षी महाराष्ट्र शासन इयत्ता पाचवी व आठवी या वर्गासाठी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची शोध घेण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा चे आयोजन करत असते. या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्री वर्धमान विद्यालयाचे तब्बल 19 विद्यार्थी पात्र झाले असून पैकी 5 विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून शिष्यवृत्ती वर आपले नाव कोरले आहे. इयत्ता पाचवीचा श्रीरामराजे निंबाळकर याने 272 गुण मिळवून जिल्ह्यामध्ये 110 वा येण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय या विद्यालयाची खडतर परीक्षा उत्कृष्टरित्या पास करून प्रवेश निश्चित केला आहे. तन्वी वच्चे 272 गुण मिळवून जिल्ह्यात 111 वी व श्रावणी निंबाळकर 258 गुण मिळवून जिल्ह्यात 297 वी येण्याचा बहुमान मिळवला आहे. इयत्ता आठवीतील कीर्ती पानसरे हिने 216 गुण मिळवून जिल्हा यादीत 256 वी व श्रीतेज पाटील याने 188 गुण मिळवून जिल्हा यादीत 563 वा येण्याचा बहुमान मिळवला आहे.

इयत्ता पाचवी चे विद्यार्थी अरमान मनेरी 188 गुण, आरव इंगळे 186, स्वप्निल होनराव 174, समर्थ तोलनुरे 170, ओम देवकर 162, अथर्व जगदाळे 160, अनुष देवकर 144, अभिजीत बाळासाहेब रणमोडे 142, विराज विजय कल्याणकर 120, इयत्ता आठवीचे जाधव वैष्णवी184, पानसरे श्रध्दा 182, न्हावकर संस्कृती 162, कणसे अथर्व 160, जाधव प्रतीक्षा 158, इगवे स्वराज 158, जाधव ज्ञानेश्वरी 152 गुण मिळवून विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले आहेत. सदर विद्यार्थ्यांना शिवप्रसाद कुलकर्णी, अनिल गवारी, सुरज मोरे,सूर्यवंशी माधुरी,गोरखनाथ निकम,हिप्परकर सारीका,पांढरपट्टे  अश्विनी,आगलावे शुभांगी,  या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष वाघ साहेब , माजी शाळा समिती अध्यक्ष अमोल गेंगजे व प्राचार्य हनुमंत कुंभार , प्रभारी प्राचार्य चंद्रकांत कांबळे , उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण  निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे व पर्यवेक्षक माणिक पिसे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा