Breaking News

१२ सप्टेंबर २०२२

सगळ्यांसारखेचं पण जरासे वेगळे माझे बाबा आदरनिय चाॅंदभैय्या शेख..

माझे बाबा या विषयी लिहीताना मला खरंतर शब्दच सुचत नाहीत.... याला कारण म्हणजे काही शब्दात बांधता येण्यासारखे बाबा निश्चितच नाहीत... सागराचे वर्णन जसे अमर्यादीत तत्सम हे... तरी ही मला जसे जमेल तसे मला भावलेले माझे प्रेमस्वरुप बाबा इथे शब्दबद्ध करायचा छोटासा प्रयत्न करते. महाराष्ट्राची शान सोलापूर चा मान सांगोल्याचा स्वाभिमान सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज युवकांचे प्रेरणास्थान माझे आदर्श, माझे गुरुवर्य, माझे श्रद्धास्थान....म्हणजेच़ दुसरे तिसरे कोणी नसुन महाराष्ट्राचे लाडके पत्रकार आदनिय चाॅंदभैय्या शेख होय............. माझ्या बाबांनी त्यांच्या लहानपणापासूनच खूप हलाखीची परिस्थिती होती त्यांच्या लहानपणी आई नावाचे छत्र हरवले गेले आई जाण्याच्या पोरकेपणा विसरतो तोचं पर्यंत आजोबांचे निधन झाले घरी अगोदरचं अठरा विश्र्व दारिद्र्य असताना दुखात सावरुन घराची संपूर्ण जबाबदारी व माझ्या तीन अत्यांची जबाबदारी बाबांवर पडली बाबा मजुरी करत असत नंतर गॅंरेज मध्ये ही काम केले आणि ते तेव्हा फक्त १७वर्षांचे होते.माझ्या बाबाचा भुतकाळ हा आम्हाला आत्या नेहमी सांगत असतात.2007साली बाबांनी पत्रकारिता क्षेत्रात पहिलं पाऊलं टाकले त्यांच्या एवढ्या थोर व्यक्तीमत्त्वाचं ओझं आमच्या नात्यावर अजिबातच नसतं. कोणताही बाप आपल्या मुलीचे जसे लाड करतो, तसे माझे लाड झाले आहेत,आणि त्यांच्या या वेस्त जिवन शैलीतुन ते आम्हाला काॅलेटी टाईम देत असता आठवड्यातून एक हा आमच्यासाठी असतो पण तो एक दिवस रोजच्या पेक्षा स्पेशल असतो..... आज आमच्याकडे भरपुर पैसा आहे पण आम्ही कधी हाॅटेल मध्ये जेवायला किंवा थेटर मध्ये मुवी बघायला गेला नाही कारण माझ्या बाबांचं एक वाक्य आम्हाला भावंडांना तोंड पाठ आहे कि,'साधी राहणी हिचं उच्च विचार सरनी' पत्रकारिता करत असताना बाबांनी एकचं सांगितलं की "जे सत्य आहे ते जगासमोर आणायचे आणि असत्य आहे ते जगाला दाखवून द्यायचं"बाबा त्यांच्या पत्रकारिता कारकीर्दीत पत्रकारिता करत असतानाचं त्यांनी प्रिंटिंग प्रेस,दैनिक डिजिटल पोर्टल,कवी,लेखक,साहित्यप्रकार, आदर्श पत्रकार, सामाजिक संघटनांचे व पत्रकार संघटना, मानवाधिकार संघटना,म.प्र.उपाध्यक्ष-राष्ट्रिय किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यासह अलीकडेचं वाड् यातील नामांकित समाजसेवक म्हणुन देखील नावलौकिक मिळवला बाबा अशा प्रकारे शिड्या चढत आहेत. माझ्या बाबाचां स्वताच्या बुद्धी कौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास बाळगणार्या माझ्या बाबांनी अत्यंत जिद्द,निर्भीड,शुन्यातुन विश्र्व उभी केलेली आहे आजच्या तरूणांना आदर्शवत अशीचं आहे त्यांना विविध क्षेत्रातील विविध संस्थेच्या माध्यमातून ९०पुरस्कार मिळाले आहे.बाबा पुर्वीपासुनचं आपल्या धारदार लेखणी च्या बळावर मोडीत काढली होती.अर्थातचं याची मोठी किंमत देखील बाबांना चुकवावी लागली हे देखील खरेचं त्यांच्यावर अनेक जीव घेणे हल्ले देखील झाले मात्र तरीही न डगमगता आपल्या लेखणीची धार कांहीं त्यांनी कमी होऊ दिली नाही.माझे बाबा हे Would in best बाबा आहे..... माझ्या शाळेत त्यांनी माझ्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. इतर पालकांप्रमाणे ते रांगेत उभा राहिले आहे. बाहेरच्या जगासाठी ते संपादक साहेब वगैरे असले तरी जेंव्हा ते माझ्यासाठी शाळेत येत असत तेंव्हा ते केवळ 'माझे बाबा' असत. कोणत्याही बाप-लेकीचं नातं म्हणजे जणू दूधामध्ये साखर विरघळावी आणि ते गोड व्हावं तसं असतं. ही प्रक्रीया जशी सोपी आणि सहज आहे अगदी तसंच आम्हा मायलेकरांच नातं सहज आणि मधूर आहे. तुमचा हा भ्रम असू शकतो. आम्ही जेव्हा शाळेत जातात तेव्हा आमचे मित्र मैत्रिणी आम्हाला सांगतात की तुझे बाबा खुप मोठा माणूस आहे. अशावेळी बाबा आम्हाला सांगतो की त्यांना जाऊन सांगा की, माझे बाबा माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी रोज कामावर जातात. " चाॅंदभैय्याआज महाराष्ट्राचे टॉपचा पत्रकार असला तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आणि विशेष म्हणजे १३सप्टेंबर ला बाबांचा वाढदिवस असतो.लाडक्या बाबांना उदंड आयुष्य अनंत शुभेच्छा...... असे म्हणतात की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" परंतु मला यापुढे म्हणावे वाटते की, "बाबांविना अस्तित्वहीन, आत्मविश्वासहीन, निरर्थक". कु.रसिदा चाॅंद शेख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा