Breaking News

११ सप्टेंबर २०२२

जनावरांच्या लंपीस्किन रोगाबाबत पशुपालकांनी दक्षता घेणे गरजेचे - डॉ . भाई . बाबासाहेब देशमुख...

सांगोला शहर प्रतिनिधी शब्बीर मो.9403182020
रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे ... अनेक जनावरांना या आजाराची लागण झलेली आहे . आशा मुळे पशुपालक शेतकरी पुरता हैराण झालेला आहे . एकतर निसर्गाची अवकृपेमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे .. फळबागा उध्वस्त झाल्या आहेत . आशा परिस्थीतीत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने काही पिके जतन केली आशा पिकांवरती वेगवेगळे रोग पडले आहेत . उसासारखे पिक सुध्दा आळीच्या प्रादुर्भावाने धोक्यात आले आहे . एवढीमोठी संकटे समोर असताना काही शेतकऱ्यांनी जोड धंदा म्हणून दुध व्यवसाय निवडला कित्येक दिवस दुधाला हवा तेवढा दर सुध्दा मिळत नव्हता आणि आता कुठे दुधाला बऱ्यापैकी भाव मिळत होता तोच या लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरे पछाडली आहेत त्यामुळे पशुपालकांचे फार मोठे नुकसान होत आहे .... लंपीस्किन हा विषाणु संसर्ग जन्य आजार आहे . आसा संसर्ग झालेल्या जनावरांना खुप ताप येतो . डोळे व नाक यातुन पाणि वाहते तसेच जनावरांचे पाय सुजतात , जनावरांच्या अंगावर पसरट स्वरूपाच्या गाठी येतात त्या गाठी जनावरांच्या अंगभर पसरतात व जनावरांना अक्षत पणा जाणवतो व जनावरांना वास घेण्यास अडचण होते व दुध देणाऱ्या जानावरांच्या दुध देण्यामध्ये घट होते . या मुळे जनावरे मृत्युमुखी पडतात . पशुपालकांनी आशी लक्षणे जनावरांमध्ये दिसल्यास जनावरांना ताबडतोब जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जाणे व उपचार करणे . ज्या जनावरांमध्ये वरील लक्षणे आढळून आल्यास अशी जनावरे ईतर निरोगीजनावरांपासून दुर ठेवावीत . संसर्ग झालेली जनावरे इतरत्र ये - जा करु नयेत . कारण ईतर जनावरांना संसर्ग होण्याची भिती आसते . संसर्ग झालेल्या जनावरांना स्वच्छ पाणि पाजावे . आशा जनावरांचे दुध वापरात आणताना शक्यतो भरपुर गरम करून वापरात आणावे . विशेषता ज्या ठिकाणी आपण जनावरे बांधतो मग तो गोठा असेल किंवा ईतर कुठलाही निवारा आसेल आशी ठिकाणे स्वच्छ धुऊन घ्यावित धुताना फिनेलचा वापर करावा . व डॉक्टरांच्या सल्ल्याने आशा ठिकाणी किटक नाशकांची फवारणी करावी . त्यामुळे संसर्ग करणाऱ्या माशा किंवा ईतरही किटकांचा नाश होईल . समजा या रोगामुळे एखाद्या जनावराचा मृत्यू झाला तर आशा जनावराचे शव उघड्यावरती टाकु नये त्यांचे योग्यप्रकारे दफ्न करावे ... लंपि हा रोग त्वचा रोग आहे.याचा संसर्ग मानवास होत नाही . आपण काळजीपूर्वक आपल्या जनावरांचे पालन पोशन करावे . पशुपालखांनी खचुनन जाता काळजीपूर्वक वरील गोष्टी केल्यास या रोगाचा संसर्ग होणार नाही . व पशुपालकांचे नुकसानही होणार नाही . तसेच या रोगाबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करावे व योग्य ते उपचारही जनावरांना करावेत ... लंपि यारोगाचा प्रादुर्भाव वाढु नये संसर्ग होऊ नये म्हणुन सांगोला येथे रविवारी भरणारा जनावरांचा बाजर सध्या तरी बंद ठेवण्यात आला आहे कारण संसर्ग होऊ नये यासाठीची ही दक्षता आहे . आशा प्रकारे प्रत्येक पशुपालकांने लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा