Breaking News
१८ ऑगस्ट २०२२
नाझरे मठ येथे सुरू झालेल्या टोल नाक्यावर सांगोला तालुक्यातील वाहनांना व रहिवाशांना टोल माफ करावा : सुरज दादा बनसोडे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाची निवेदनाद्वारे मागणी
सांगोला प्रतिनिधी:
सांगोला तालुका नाझरे मठ येथे सुरू झालेल्या टोलनाक्यावर सांगोला तालुक्यातील वाहनांना व रहिवाशांना टोल माफ करावा अशी मागणी आरपीआय तालुका अध्यक्ष सुरज दादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
सोलापूर कोल्हापूर हायवे वर सांगोला तालुक्यातील नाझरे मठ येथे टोलनाका सुरू झाला असून, सांगोला तालुक्यातील 30 टक्के गावे ही टोलनाक्याच्या पलीकडे म्हणजे सांगलीकडे आहेत व 70 टक्के गावे ही सांगोला शहराकडे म्हणजेच सोलापूर कडे आहेत. तरी ह्या ग्रामीण भागातील गावांना सांगोल्याकडे काही ना काही कारणास्तव सारखे यावे लागते. मग ते शासकीय काम असो किंवा मजुरीचे काम असो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपूरक कामासाठी व काही वेळा दवाखान्यासाठी ये जा करावी लागते. सांगोला तालुका दुष्काळी तालुका असल्याने तालुक्यातील जनतेला आर्थिक सोर्स नसल्याने त्यांना टोल भरणे शक्य नाही. तरी सांगोला तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन टोल माफ व्हावा अशी मागणी व प्रस्ताव शासनाकडे तयार करून पाठवावा. सदरची टोल माफी न झाल्यास त्या संदर्भात सांगोला तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल. या आंदोलनामुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष मा. नगरसेवक सुरज दादा बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक अरुण (आण्णा) बनसोडे, युवक तालुका अध्यक्ष आनंद दादा होवाळ उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा