Breaking News

२९ ऑगस्ट २०२२

महाराष्ट्रातील समविचारी पत्रकारांनी मिळून महाराष्ट्र मीडिया असोसिएशनची स्थापना केली असून अमित बागडे यांची अध्यक्ष पदी एकमुखाने निवड घोषित..

बारामती: प्रतिनिधी देशात पत्रकारांच्या संरक्षणासाठी अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या आहेत मात्र खरंच त्या संघटनेतून अन्यायग्रस्त पत्रकारांसाठी काही केले जाते? आपण पाहत असतो की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत क्षणाक्षणाची अपडेट ठेवणारा मीडिया म्हणून डिजिटल मीडिया कडे पाहिले जाते. मात्र या डिजिटल मीडिया च्या पत्रकारांसाठी विधान भवन, संसद भवन येथे कोणताही आमदार खासदार कधीही बोलताना दिसत नाही. सर्वसामान्य घरातील निर्भिड लेखणी करणारे डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी त्यांचा आवाज विधान भवन,संसद भवन पर्यंत पोचवण्याचे काम महाराष्ट्र मीडिया असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अमित बागडे यांनी दिली. निर्भिड व स्पष्ट लेखनी मुळे डिजिटल मीडिया च नव्हे तर देशातील कोणत्याही पत्रकार वर्ती आज खंडणी सारखी खोटे गुन्हे दाखल करून देशाच्या चौथ्या स्तंभास गिळंकृतकरण्याचा प्रकार समाजातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आज करीत आहे. अशा समाजकंटकांना या संघटने च्या मार्फत भविष्यात कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल. पत्रकारांवर ती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एक मुखाने आवाज उठऊ या चला संघर्ष करू या पत्रकार हा भारतीय संविधानाचा चौथा स्तंभ आहे समाजात वावरत असताना दुसऱ्या वरती अन्याय-अत्याचार झालेल्या घटना पत्रकार आपल्या चैनल च्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवत असतो. मात्र दुसऱ्या वरील अन्याय-अत्याचार दाखवता दाखवता स्वतःवरती होणारा अन्याय पत्रकार विसरला की काय. आत्ताच आपण देशाचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला मात्र अद्यापही या पत्रकार बांधवांसाठी प्रशासनाकडे कोणीही त्याच्या मानधनासाठी अथवा इतर सुविधांसाठी मागणी केलेली नाही. लवकरच या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र मीडिया असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे. तसेच पत्रकारांवर ती खोट्या झालेले खंडणीच्या केसेस तात्काळ मागे घेण्यात याव्यात अशीदेखील मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली जाणार आहे. माझ्या पत्रकाराला वेळीच न्याय भेटला नाही तर भविष्यात महाराष्ट्र मीडिया असोसिएशनच्या वतीने एक मोठा लढा उभा केला जाईल अशी देखील माहिती संस्थापक अध्यक्ष अमित बगाडे यांनी दिली. खरंच भविष्यात जर चौथास्तंभ शाबूत ठेवायचा असेल तर सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन एका विचाराने या लढ्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा