नाझरे प्रतिनिधी
श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे.
जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व यासाठी कानकात्रे विठ्ठल नगर मायणी येथे रविवार दिनांक 8 जून रोजी सायंकाळी पाच वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले.
सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आवाहन किशोर सूर्यवंशी, दादा चव्हाण, हनुमंत सावंत, दत्तात्रय सावंत, अमोल चव्हाण यांनी केले आहे.
तसेच गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी यासाठी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे स्वामी भक्त अमोल चव्हाण, सागर जाधव, कृष्णा निकम, महेश जाधव यांनी आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा