प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर महाविद्यालयात विश्वास महोत्सव स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. विश्वास महोत्सव स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्नेहसंमेलनाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुभेच्छा देत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी महाविद्यालयात विविध कला गुणदर्शन सादर करण्याची संधी विश्वास महोत्सवांमधून मिळत असल्याचे सांगितले. संस्थेने माझ्यासाठी खूप केले आहे ते मी विसरणार नाही असे सांगत जीवनात आनंद द्यायचा व घ्यायचा असतो.विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये खेळामध्ये भाग घ्यायचा असतो .आयुष्यात शेवटी काय असते, हसत खेळत राहायचे,कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नसल्याचे सांगत इच्छाशक्ती प्रबळ ठेवून आयुष्यातील न्यूनगंड दूर सारून यशस्वीपणे वाटचाल केल्यास जीवनात यश मिळत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. जीवनात कष्ट, मेहनत, घाम गाळल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नसल्याचे सांगत जादूची कांडी फिरवल्यासारखे यश लगेच मिळत नसल्याचे सांगितले. आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रबळ इच्छाशक्ती शिवाय आयुष्यातील यशस्वी मार्ग सापडत नसल्याचे तर न्यूनगंड दूर ठेवून जीवनातील काटे ,संकटे दूर करून आयुष्याला यशस्वीपणे वाटचाल करता येत असल्याचे सांगितले. आपल्या संस्थेचा व महाविद्यालयातील प्राध्यापकांचा तसेच आपल्या आई-वडिलांचा नेहमी मान ठेवला पाहिजे त्यांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे असे मत भरणे यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांना शब्द दिला की, मी नेहमी तुमच्या पाठीशी असतोच पण भैय्या तुम्ही पण तेवढ्याच विश्वासाने माझ्या पाठीशी आहात याचा मला अभिमान आहे. असे मत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमुळेच आपणाला प्रेरणा मिळत असून आजही मी स्वतःला विद्यार्थी समजत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल होत असताना महाविद्यालयासाठी बंदिस्त प्रेक्षाग्रहासाठी एक कोटी निधी मंजूर करणार असल्याची घोषणा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.स्वर्गीय विश्वास दादा रणसिंग व स्वर्गीय आण्णासाहेब हेगडे यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून त्यांची दुसरी पिढी यशस्वीपणे संस्था चालवत असल्याचे सांगितले.संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी संस्था व रणसिंग कुटुंब शेवटचा श्वास असेपर्यंत भरणे मामा तुमच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडी विद्यालयाच्या हॉलीबॉल संघाने खासदार चषक मिळवल्याबद्दल विद्यार्थी व पालकांचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी काजल जाधव हीचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे, शंकरराव रणसिंग राही रणसिंग ,प्राचार्य विजय केसकर ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग , स्नेहसंमेलन अध्यक्ष राजेंद्रकुमार डांगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या गुळीग,क्रीडा संचालक सुहास भैरट,श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक अभिजीत रणवरे, वालचंद विद्यालय प्राचार्य सुरेश अर्जुन,मुख्याध्यापक प्रमोद भोंग,मुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी,निमसाखर सरपंच धैर्यशील रणवरे, कुरवली सरपंच राहुल चव्हाण,चिखली सरपंच उत्तम खोमणे,पोलीस पाटील विलास कणसे,पंचायत समिती माजी सदस्य सुहास डोंबाळे ,किसनराव पोळ,ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे,संदीप पाटील आदी व कुरवली,चिखली,कळंब,वालचंदनगर ,रणगाव ,निमसाखर , निरवांगी परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत शिंगाडे आणि प्रा.कपिल कांबळे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा