विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
बारामती :- १५ जून रोजी शाळा भरली आणि नवीन विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली.वाकी गावातील अंगणवाडी तसेच इयत्ता पाहिली ते चौथी पर्यंत असणाऱ्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी पुस्तके, खाऊ व गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.तर वाकी गावातील प्रसिध्द कवयित्री हभप सौ. शुभांगी सोमनाथ जाधव यांनी मुलांच्या स्वागतासाठी स्वलिखित कवितांचे सादरीकरण केले .त्याच बरोबर अभ्यास ,संस्कार आणि आपली मराठी भाषा किती महत्वाची आहे हे त्यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले.
यावेळी गावातून विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती मधील सदस्य तसेच सरपंच देखील उपस्थित होते.
यावेळी मराठी शाळेच्या शिक्षिका राणी मिसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर मुख्याध्यापक मुकुंद गाडे यांनी आभार मानले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा