विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
पुणे :- पुणे स्नेह कलाविष्कार संस्था आयोजित "पहिले जय भीम साहित्य संमेलन 2024" सन्माननीय आचार्य रतनलाल सोनाग्रा (जेष्ठ साहित्यिक विचारवंत) यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे उत्सवात पार पडले.
संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय डॉ मिलिंद भोई होते. तर कार्याध्यक्ष राम सर्वगोड राहुल जाधव हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. वसंतराव पाटील (न्यायाधीश) मुंबई ,तसेच मा. सुभाष सोनवणे साहित्यिक व्याख्याते अहमदनगर, मा. विठ्ठल गायकवाड रमापुत्र लक्ष्मण शिंदे ॲड.वैशाली चांदणे , तर... कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सिताराम नरके साहेब होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात आचार्य सोनाग्रा सरांनी वास्तववादी अनेक मुद्यांवर भर देत. लोकशाही रक्षणाची जबाबदारी सांगणारे हे साहित्य संमेलन आहे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे न्यायाधीश वसंतराव पाटील, साहित्यिक सुभाष सोनवणे, आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या ओघवत्या शैलीत बहारदार दमदार कामगिरी बजावली कवी संमेलनामध्ये अनेक निमंत्रित कवींनी सहभाग नोंदवला . प्रगती मोरे, रमाकांत पडवळ अरूण कांबळे योगिता कोठेकर दिनेश कांबळे , बाळासाहेब गिरी राहुल भोसले आनंदा भारमल, गजानन उफाडे चंद्रकांत जोगदंड आनंदा साळवे यांसह अनेक मान्यवर कविंनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.
साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना वरील गीत गायनांचा सुंदर असा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्रातील काही मान्यवर गायिकांनी व गायिकेनी सहभाग नोंदवला . लेखक राम सर्वगोड यांच्या "नवा समाज" ह्या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असणाऱ्या काही ज्येष्ठ समाज बांधवांना यावेळी संमेलनाध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.अशा प्रकारे पहिले जयभीम साहित्य संमेलनाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा