निरा नरसिंहपुर: दिनांक24, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि शिस्तप्रिय नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांचे श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर हे कुलदैवत खरे तर निराभिमेच्या संगमावर आणि अतिशय प्राचीन असं पुरातन हेमाडपंती पूर्ण दगडांमध्ये आखीव रेखीव असणारे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नीरा नरसिंहपुर गावच्या विकास आराखड्यासाठी 282 कोटी रुपये निधी दिला होता . पण आज दहा-बारा वर्षे उलटून गेली तरीही यातील विकास कामे पूर्ण झालेली नाहीत. याच्यामध्ये अंडरग्राउंड लाईटच्या कामाच्या केबला वरतूनच टाकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लाईटचे जे पॅनल बॉक्स बसवले आहेत त्या बॉक्सला करंट येणे, जाळ होणे ,वायरा जळणे असे प्रकार घडत आहेत .त्यामुळे गावातील लहान मुले ,शाळेतील मुले आणि बाकीचे ग्रामस्थ यांच्याही जीविताला धोका आहे.पिण्याच्या पाण्याची टाकीचे आणि पाईपलाईनचे काम अपूर्णच आहे, नद्यांवरील दोन्हीही बाजूचे सप त्याचेही काम अपूर्णच आहे. त्याचप्रमाणे अंडरग्राउंड गटारीचे काम हे अद्यापही अपूर्णच आहेत. ग्रामस्थांनी याची चौकशी केली तरीही कोणीही याची उत्तरे देत नाही. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर ते सांगतात की कॉन्ट्रॅक्टर हे ह्या भागातील राजकारण्यांचे संबंधातील आहेत. त्यामुळे आम्ही काही करू शकणार नाही. तरीही नीरा नरसिंहपुर येथील विकास कामाची लवकरात लवकर चौकशी करून ती पूर्ण केव्हा होतील याची कल्पना ग्रामस्थांना फ्लेक्स च्या माध्यमातून संबंधित खात्यामार्फत देण्यात यावी. निकृष्ट प्रतीची कामे करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर वरती कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे या सर्व विकास कामांची चौकशी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. निरा नरसिंहपुर विकास आराखड्यामधील या कॉन्ट्रॅक्टर लोकांना जे जे लोक पाठीशी घालत आहेत असे पुढारी आणि राजकारण्यांवरती ही कारवाई करण्यात यावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा