![]() |
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी टोल वसुलीच्या विरोधात मोठे जन आंदोलन करणार असल्याची माहिती नितीन रणदिवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार टोळणाक्याच्या 25 किलोमीटर परिसरातील वाहनांना टोल माफ करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकार द्वारे सांगूनही अनकढाळ येथील टोलनाक्यावर राजरोसपणे टोळ आकारला जात आहे सदरचा टोल वसुलीचा पराक्रम बंद करा अन्यथा टोल नाका फोडण्यात येईल असे आवाहन सांगोला तालुक्याचे युवा नेते नितीन भाऊ रणदिवे यांनी केले आहे
टोलनाक्याच्या परिसरामध्ये उदनवाडी, नाझरे, सरगर वाडी, चोपडी ,बलवडी ,कमलापूर ,वाटंबरे, अजनाळे, य. मंगेवाडी, राजुरी ,मानेगाव ,बुधेहाळ, कोळा या परिसरामधून शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर ये जा होत असते त्यांना वेळोवेळी टोल भरणे त्रासदायक असल्याचे समोर आले आहे पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असताना जबरदस्तीचा टोल वसूल केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा