प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री वर्धमान विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेची भरघोस निकालाची परंपरा कायम ठेवली असून पाचवी चे 14 तर आठवीचे 4 विद्यार्थी चांगल्या गुणांनी यश संपादन केले आहे.
इयत्ता पाचवी चे प्रांजली निलेश कुचेकर, कुणाल संजय खराडे, अमृता गणेश जामदार, काजल सुभाष घोंगडे, स्वयम् विजय खोमणे, श्रेयश रामचंद्र बागनवर, वेदांत नितीन धापटे, स्वराज सुरेश लोंढे,मोक्षदा अमोल शेळके,शिवांजली उमेश हगवणे,अंश अलंकार गायकवाड,राजलक्ष्मी संग्रामसिंह रुपनवर, संग्राम मानसिंग राजपूत,
अपेक्षा पांडुरंग धापटे तर इयत्ता आठवीचे रोहित जाधवर, प्रेम रूपनवर, गणेश खरात, समृद्धी मोरे हे विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले आहेत. यावर्षी गुरुकुल वर्ग या संकल्पनेतून शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, मंथन परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा यासारख्या परीक्षांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग व 100 पेक्षा जास्त सराव प्रश्नपत्रिकांचा सराव विद्यालयात आयोजित केले. या अतिरिक्त मार्गदर्शन वर्गामुळेच विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेमध्ये यश प्राप्त केले आहे असे प्रतिपादन प्राचार्य हनुमंत कुंभार यांनी केले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल वर्गाचे प्रमुख सुरज मोरे, अनिल गवारी, लक्ष्मी सरगर, देवराम प्रधान व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख गोरख निकम, शुभांगी आगलावे, नितीन कुलकर्णी, रावसाहेब विरकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, प्राचार्य हनुमंत कुंभार, उप मुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, पर्यवेक्षक चंद्रकांत कांबळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा