प्रतिनिधी - संतोष कदम.
अंथुंर्णे : ( ता . इंदापूर) दि. २० एप्रिल रोजी राजगृह बुद्ध विहार समिती अंथुंर्णे महात्मा फुले कॉलनी (उखळमाळ ) येथे भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयतेचा भीम प्रहार साप्ताहिकाचे संपादक भीमसेन उबाळे सर, अमर बोराटे सर, वंचित बहुजन आघाडी पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष राजकुमार, माजी उपसरपंच राघू गायकवाड उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत जयंती उत्सव मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, यांचे प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून झाली.
यावेळी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना राजकुमार व बोराटे सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील कठीण प्रसंग व त्यांनी केलेल्या त्यागाची ,कार्याची महती , भारतीय संविधानाचे महत्त्व , आज सद्य परिस्थितीत बाबासाहेबांचे विचार व त्यांची अर्थ, सामाजिक सर्व व्यापी दूरदृष्टी सर्व समाज घटकांना , देशाला आवश्यक आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून मांडले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ॲड. भागवत तोरणे, सौ. पुनम गणेश पारसे हिची मीरा -भाईंदर , वसई - विरार ( ठाणे ) पोलीस पदी निवड झाल्याबद्दल जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्वानंद राजू तोरणे या सहावीतील विद्यार्थ्याने बाबासाहेबांच्या विद्यार्थी जीवनातील काही प्रसंग आपल्या भाषणातून मांडले. त्याचे वकृत्व प्रभावशाली भाषण पाहून उपस्थित मान्यवरांनी त्याचे कौतुक, सत्कार करून त्याला बक्षीस दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुकाध्यक्ष मनोज साबळे ,अंथुर्णे ग्रा. पंचायत सदस्य रेणुका कांबळे, पत्रकार संतोष कदम , दशरथ लोंढे सर , प्रगतशील बागायतदार विकास व मंगेश रणमोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धांडोरे, माजी उपसरपंच संजय वंचाळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश गंगणे यांनी केले. तर आभार सुनील केंगार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आण्णा तोरणे व उपाध्यक्ष सचिन केंगार , संतोष कांबळे, अतुल बनसोडे, विकास खरात, संतोष गवळी, संजय धीमधीमे , स्वप्निल धीमधीमे, बाळा केंगार, नितीन केंगार, अविनाश अहिवळे, बबलू वंचाळे, आदी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती सभोवताली केलेली विद्युत रोषणाई व कारंजे आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती. उत्सव कमिटीने सर्वत्र विद्युत रोषणाई डेकोरेशन केले होते त्यामुळे विद्युत रोषणाईने संपूर्ण बुद्ध विहार परिसर उजळून निघाला होता.
सायंकाळी ठीक ९:३० वाजता भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व समाजबांधवांनी उपस्थिती दाखवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा