प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंद नगर :- (ता. इंदापूर ) मंगळवार, दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी श्री वर्धमान विद्यालयात भारतीय प्रथम महिला मुख्याध्यापिका, शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रम करून मोठ्या उत्साहात साजरी केली.
बालिका दिनानिमित्त प्रचिती अंबिके,रवीना कांबळे, सृष्टी देसाई,मल्हारी देवडीकर,श्रेया अर्जुन व स्वरांजली रकटे यांनी सहभाग घेऊन त्यांची मनोगते व कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी गायकवाड यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक अनिल उबाळे व सुचिरता पडतूरे यांनी सावित्रीबाई फुले यांची जीवनपट व कार्य याचे विवेचन आपल्या शिक्षक मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी यांनी मांडले तर प्राचार्य चंद्रकांत कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आजही समाजाला नितांत गरज आहे हे आपल्या विचारातून विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमासाठी फलक लेखन अतुल गायकवाड यांनी सावित्री माईंचे व्यक्तिचित्र रेखाटून त्यांचे विचार चित्रातून दर्शविले तसेच संपूर्ण कार्यक्रमासाठी स्टेजव्यवस्था व बैठक व्यवस्था शिक्षक विजयसिंह पाटील, नितीन कुलकर्णी व अरविंद देठे यांनी पाहिली.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे व विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा