सांगोला (प्रतिनिधी): दिपावली सणानिमित्त दोनच दिवस दैनंदिन कामाला रोजगाराला सक्तीची सुट्टी असते. दोन दिवसांनंतर पुन्हा त्यांना दैनंदिन कामासाठी मजुरीसाठी घराबाहेर पडावे लागणार आहे. अशा लोकांना चार घास सुखाने गोडधोड खायला मिळावे, यासाठी लवकरात लवकर शिधा पत्रिकेवर कमी दरातील माल मिळावा व अशा लोकांचीही दिपावली आनंदी व सुखकर जाण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केली.
दिपावली सण साजरा करण्यासाठी सर्वतोपरीने सरकारनेच मदत करावी अशी भाबडी आशा कोणीच करणार नाही. परंतु सरकारची नैतिक दृष्ट्या देशातील, राज्यातील गावातील समाजातील. पर्यायाने घराघरांतील नागरीक आपले विविध सण अगदी आनंदाने व्हावेत व त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही प्रमाणात मदत करणे गरजेचे आहे त्याचाच एक भाग म्हणजे. ज्या ज्या नागरिकांना शिधा पत्रीका म्हणजे राशन कार्ड आहे अशा लोकाना दिवाळीच्या सणासाठी कमी किंमतीमध्ये तेल, डाळ, साखर, गरा, मैदा आशा वस्तू दिल्या जातात. त्या वस्तू लवकरात लवकर नागरीकांना द्याव्यात. दिपावलीचा सण एक दोन दिवसांवरती आलेला असेल तरीही अजुन दिपावली साठी राशन दुकानात मिळणाऱ्या कमी दरातील वस्तू नागरीकांना अजुनही मिळाल्या नसतील तर ते अयोग्य असल्याचे डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा