अजनाळे: सचिन धांडोरे: नवरात्री मध्ये देवीची नव रुपे आहे स्री हे देविचे पहिले रुप आहे पहिल्यांदा बाळ,नंतर मुलगी,पत्नी,सुन मग सासु अशी रुपे आहेत.स्री ही आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही ती आपल्या कुटुंबाचा पाया आहे त्यामुळे स्त्रीने आपल्या आरोग्य कडे लक्ष दिले गेले पाहिजे असे मत डॉ निकिता ताई देशमुख यांनी व्यक्त केले.काल अजनाळे येथे आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवानिमित्त माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ निकिताताई देशमुख आपले विचार व्यक्त करत होत्या. याप्रसंगी सरपंच सुजाता आरोग्य सेविका सिंधू गडदे, आरोग्य सेवक डॉ. अशोक कलाल, पल्लवी धांडोरे, रंजना येलपले, ज्योती येलपले,छाया धांडोरे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ निकिताताई देशमुख आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले की, स्रीया या आपल्या कुटुंबाचा पाया आहेत तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमची कौटुंबिक दिनचर्या कोलमडून जाते आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष वेळीच लक्ष दिले तर आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत आपल्या आरोग्याकडे प्रामुख्याने समस्या उद्भवते ती म्हणजे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन ची कमतरता आहे त्यामुळे थोडे जरी काम केले तरी शरीरात थकवा जाणवतो हिमोग्लोबिन चा शरीरात घटत कमी असल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात अजनाळे गाव संपूर्ण देशभरात डाळिंब पिकाने प्रसिद्ध आहे डाळिंबामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम चे प्रमाण आहे. जेवण झाल्यानंतर कमीत कमी दोन तास चहा पिऊ नका चहा पिल्याने शरीरामधील लोहाचे प्रमाण कमी होते आपल्या पूर्वजनाने आपले आयुष्य खूप सुंदर केले आहे पण आपल्या पुढच्या पिढीचे आयुष्य सुंदर करायचे असेल तर आपण प्रयत्न करायला हवा. पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर महिलांना पायपीट करावे लागत होती. आबासाहेबांनी ही समस्या ओळखून पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवला आहे. महिलांनी आरोग्याच्या बाबतीत लक्ष देऊन आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत याकडे गांभीर लक्ष दिले गेले पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ अशोक कलाल यांनी मानले या कार्यक्रमाला महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा