आज सोमवार दि १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३०ते ६:०० च्या दरम्यान अजनाळे- सोनलवाडी शिवेच्या जवळपास सहा ते सात लांडग्यांची टोळी निदर्शनास आल्यामुळे पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजनाळे परिसरातील डाळिंबाच्या बागा तेल्या, मर रोग ,खोडआळी यासारख्या रोगराईमुळे डाळिंबाच्या बागा नष्ट झाल्या आहेत त्यामुळे येथील शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचा कल पशुपालनाकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
यातच सध्या लंपी या रोगाने महाराष्ट्र भर थैमान घातले आहे त्यामुळे शेतकरी पहिलेच चिंताग्रस्त असताना या लांडग्यांच्या वावरामुळे अजनाळे आणी सोनलवाडी परिसरा मधील शेतकरी आणखी भयभीत झाले आहेत या सदरच्या घटनेकडे वन विभाग लक्ष देऊन लांडग्यांचा बंदोबस्त करणार का? याकडे अजनाळे आणी सोनलवाडी व आसपासच्या पशुपालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा