Breaking News

२२ सप्टेंबर २०२२

शेतकऱ्यांनी एकच पिक न घेता पिक बदलून शेती केली पाहिजे; लातुरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांचे अजनाळे येथे प्रतिपादन: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह दहा गावचे सरपंच यांनी केली अजनाळे गावाची पाहणी..


 अजनाळे: सचिन धांडोरे: जिल्हा परिषद लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी  गिरी यांनी काल बुधवार दि २२ सप्टेंबर रोजी अजनाळे गावाला भेट देवुन शेतकरी विजयदादा येलपले यांच्या पिंक तैवान पेरू बागेची पाहणी करुन अभिजीत येलपले यांच्या शेततळ्यावर जावुन मोत्याची शिंपली यांची पाहणी केली.  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्यक्त करताना म्हणाले की, अजनाळे गावाने डाळिंबामध्ये मोठे नाव कमवले आहे परंतु डाळिंब पिकावर तेल्या,मर,पिनहोल बोरर या रोगामुळे डाळिंब पीक ग्रासले आहे डाळिंब पीक हे सतत घेतल्यामुळे गावावर काय परिस्थिती आली. आमच्या लातुर भागामध्ये सोयाबीन ऊस या सारखी पिके आम्ही घेत आहोत परंतु सध्या सोयाबिन ,ऊस पिक आमची साथ सोडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकच पिक न घेता पिक बदलुन घेतले पाहीजे त्यामुळे आपल्या गावाचा निश्चितपणे विकास होईल असे मत लातुर चे मुख्य कार्यकारी अधिकारी  गिरी साहेब यांनी व्यक्त केले.




याप्रसंगी सरपंच सुजाताताई देशमुख, उपसरपंच अर्जुन येलपले, जिल्हा परिषद समाज कल्याण माजी सभापती  संगम धांडोरे, सोलापूर जिल्हा दूध संचालक विजय येलपले, विष्णू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बापू कोळवले, चंद्रकांत कोळवले, चंद्रकांत पवार, डॉ अशोक कलाल,सिंधु गडदे, सागर देशमुख निलेश देशमुख,योगेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे ग्रामसेवक संदीप सरगर, प्रशांत बनसोडे, प्रगतशील बागायतदार महादेव लाडे यांच्यासह अन्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व आभार डॉ अशोक कलाल यांनी मानले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा