Breaking News
२६ ऑगस्ट २०२२
गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असणारा मातंग समाज मंदिराचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा; सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन वाघमारे यांची मागणी...
अजनाळे ग्रामपंचायतीला मातंग समाज मंदिराची अँलर्जी;
अजनाळे:सचिन धांडोरे: अजनाळे ग्रामपंचायतीने गेल्या दहा-पंधरा वर्षापूर्वी नविन मातंग समाज मंदिर मंजुर झाले आहे असे सांगुन जुन्या मातंग समाज मंदिराची विल्हेवाट लावली आहे.दहा-पंधरा वर्ष झाली तरी झोपलेल्या ग्रामपंचायतीला जाग कधी येणार? अशी संतप्त प्रतिक्रिया मातंग समाज बांधवाकडून व्यक्त केली जात आहे.अजनाळे ग्रामपंचायतीला मातंग समाज मंदिरा बाबत वेळोवेळी लेखी अर्ज देऊन विचाराना केली असता ग्रामपंचायतीने जाग्याची अडचण आहे असे सांगून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मातंग समाज मंदिर नविन इमारत बांधली नाही. या इमारत बांधकामासाठी शासनाकडून लाखो रुपये मंजूर झाले होते. परंतु त्यावेळच्या संबंधित सरपंच, ग्रामसेवक ढिसाळ नियोजनामुळे हे काम आज तागायत पूर्ण झाले नाही. असा आरोप सुदर्शन वाघमारे यांनी केला आहे. पूर्वी असलेल्या मांतग समाज मंदिराची जागा त्याच जागेवर नवीन मातंग समाज मंदिराची उभारणी करावी अशी मातंग समाज बांधवाकडुन वेळोवेळी मागणी केली जात आहे. दहा-पंधरा वर्षापासून झोपलेल्या ग्रामपंचायतीने मातंग समाज मंदिराकडे कधी गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.मात्र मातंग समाज बांधवांची मते निवडणुकीत आपल्याला कशी मिळतील यासाठी मात्र स्थानिक नेते मंडळींनी वेळोवेळी प्रयत्न केला गेला आहे. मात्र मातंग समाज मंदिराचा प्रश्न सोडवावा हा प्रश्ना विषयी कधी नेते मंडळींनी चर्चा केली गेली नाही.तरी अजनाळे ग्रामपंयतीने मातंग समाज मंदिराबाबत गांभीर्याने विचार करावा अन्यथा याचा भविष्य काळात निश्चितपणे विचार केला जाणार आहे. अजनाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सुजाताताई देशमुख, उपसरपंच अर्जुन येलपले, ग्रामसेवक संदीप सरगर यांनी लक्ष घालून मातंग समाज बांधवांचा अंत न बघता लवकरात लवकर मातंग समाज मंदिराचा विषय मार्गी लावावा अशी मागणी सुदर्शन वाघमारे, चंद्रेश वाघमारे, सुभाष वाघमारे, उत्तम वाघमारे, विकास वाघमारे, संजय वाघमारे, सुनील वाघमारे, आकाश वाघमारे यांनी केले आहे..
आम्ही गेल्या दहा वर्षापासून अजनाळे ग्रामपंचायतीला जवळपास दहा लेखी अर्ज दिले आहेत. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या ग्रामपंचायतीने आजतागायत कुठलेही साधक-बाधक चर्चा सुद्धा ग्रामपंचायतीने केली नाही त्यामुळे ग्रामपंचायतला मातंग समाज मंदिराची अँलर्जी आहे का ? अशी प्रतिक्रिया समाज बांधवाकडून व्यक्त केली जात आहे. तरी ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास ग्रामपंचायती समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.. सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन वाघमारे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा