Breaking News
२६ ऑगस्ट २०२२
राज्य व केंद्र सरकारला दलित व मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कडक निर्णय घ्यावेच लागतील : सुरज दादा बनसोडे
सांगोला शहर प्रतिनिधी शब्बीर मुलाणी
आरपीआय आठवले गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर
राज्य व केंद्र सरकारला दलित व मुस्लिम यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कडक निर्णय घ्यावेच लागतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष व मा. नगरसेवक सांगोला सुरज दादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पुढे बोलताना सुरज दादा बनसोडे असे म्हणाले की, सबंध देशामध्ये दलित व मुस्लिम समाजावर जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार होत आहेत. गुजरात मध्ये घडलेल्या गोद्रा हत्याकांडामध्ये एका मुस्लिम महिलेवर मानवतेला काळीमा फासणारे कृत्य जातीवादी व धर्मद्वेशी माथेफिरू लोकांनी जाणीवपूर्वक केले. असे कृत्य हे निंदनीय असून त्यांची सुटका करणे व ते पण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी ही गोष्ट विचार व चिंतन करण्यासारखी आहे.
सदरची महिला ही मुस्लिम असल्यामुळे या गोष्टीकडे इतर समाजातल्या व धर्मातल्या व्यक्तींनी दुर्लक्ष करणे ही लाजिरवाणी बाब आहे. सदरची बाब म्हणजे भविष्यात या देशात याद्वी माजवणे व लोकशाही संपुष्टात आणून संविधानावर घाला घालून हिंदुत्वाच्या नावाखाली मनुस्मृति लादणे आहे. मनुस्मृति मध्ये स्त्रियांचा आदर नसून अनादरच आहे. स्त्रियांना धर्माच्या बंधनात अडकवून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे आहे ही देशासाठी विघातक प्रवृत्ती होऊ शकते. शिवाय औरंगाबाद व उस्मानाबाद येथे कारणावरून जातीवादी भावनेतून मातंग समाजाच्या व्यक्तींना ठार मारून काही इतर जातीद्वेशातून मातंग समाजाला विवस्त्र करून मारहाण केली ही फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात घडणे ही लाजिरवाणी बाब आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पिढ्यानपिढ्या बहुजन समाजावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून अन्याय अत्याचाराची मालिका आजतागायत सुरू आहे भविष्यात ते थांबेल का नाही याची शाश्वती नाही. गाव पातळीवर इतर समाजाकडून दलित समाजावर अन्याय अत्याचार केले जातात. व देशपातळीवर धर्माच्या नावाखाली मूस्लिम समाजावर अन्याय अत्याचार केले जातात. हे देशाच्या एकात्मतेला व सर्वधर्मसमभाव या संविधानातील वाक्याला कसलाच अर्थ राहत नाही. म्हणून भविष्यात या राज्य व केंद्र शासनाने दलित व मुस्लिम समाजावर होत असलेले अनेक प्रकारचे अन्याय हे थांबवले नाहीत व अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात कडक कायदे करावेत.
भविष्यात दलित व मुस्लिम समाजाच्या सहनशीलतेचा राज्य व केंद्र शासनाने अंत पाहू नये. दलित व मुस्लिम समाज हे भारतीय संविधानाचा आदर करत आहेत म्हणून ते या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून लोकशाही पद्धतीने त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शांततेत आंदोलन करत असतात. तरी आपण पुढील काळात या दोन्ही समाजावर अन्याय कसे होणार नाहीत याची दक्षता घेणे शासनाचे कर्तव्य आहे. तरी शासन आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर या दोन्ही समाजाला एकत्र येऊन उग्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
असा इशारा यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष व मा. नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र संघटक अरुण आण्णा बनसोडे, युवक तालुकाध्यक्ष आनंद दादा होवाळ, देवराज बनसोडे, काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे, ॲड. शशिकला खाडे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष फिरोज मनेरी, शहराध्यक्ष तोहिद मुल्ला, मा. नगरसेवक अस्मिर तांबोळी, नूर मनेरी, तोफिक मुजावर, रउफ खाटीक, शहजाद बागवान, निसार तांबोळी, साजिद तांबोळी, नरेश बनसोडे,
सायबा बनसोडे, नाना सोनवणे, पंकज बनसोडे, अलंकार तोरणे, दीपक तोरणे, महादेव चंदनशिवे, विनोद रणदिवे, चंद्रकांत मोरे, दुर्योधन सूर्यगंध, सचिन चंदनशिवे, दीपक होवाळ, बाबा चंदनशिवे, पप्पू आयवळे, रूनील चंदनशिवे, मेहबूब रायटर, अर्जुन गेजगे, दिगंबर भजनावळे, हनी भाऊ कांबळे, सतीश ठोकळे, बापू सरवदे, अमोल यादव, धोंडीराम कांबळे, सचिन उबाळे, पांडूरंग कांबळे, अमजद मुलानी, रामा शिरतोडे, सद्दाम तांबोळी, शिवाजी इंगवले, उमेश मंडले, बाबा वाघमारे, दीपक होवाळ शिरभावी, शाहरुख मनेरी, हैदर खाटीक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा