Breaking News

०१ जून २०२५

प्रा.शरद चव्हाण यांची चेअरमन पदी बिनविरोधनिवड



 मंगळवेढा/ येताळा खरबडे

पंढरपूर येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर या पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रा.शरद चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच बरोबर व्हॉईस चेअरमन पदी प्रकाश सूर्यवंशी यांची तर सचिव पदी प्रमोद घाडगे तसेच संचालक अजिंक्य वाघमारे, गणराज ढोबळे, दामोदर जाधव, रणजीत भैय्या चव्हाण, योगिता चव्हाण ,दिपाली आसबे यांची निवड करण्यात आली.

 यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सांगोलकर साहेब यांनी काम पाहिले या निवडीच्या वेळी महेश वनसाळे, प्रताप काळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते सर्व नव नियुक्त संचालक मंडळाचा सत्कार संस्थापक अध्यक्ष एस.के. चव्हाण सर यांनी केला.

३१ मे २०२५

अजनाळे ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी


 अजनाळे : 

अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या  कार्याचा गौरव करत ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हे पूजन विद्यमान सरपंच सौ. अनिता पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी सरपंच सौ. सुजाता देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सौ. दिपाली लाडे, ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर, पोलिस पाटील भंडगे, युवा नेते चंद्रकांत पवार, राणी पोतदार, योगेश देशमुख, महेश चव्हाण, महादेव भंडगे आणि अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी युवा कार्यकर्ते योगेश देशमुख यांनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवींच्या दूरदृष्टी, शासकीय कार्यपद्धती, आणि समाजहितासाठी केलेल्या कामांचे वर्णन करत तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “अहिल्यादेवींनी स्त्रीशक्तीचा आदर्श ठेवल्याने आज आपल्याला स्त्री नेतृत्वाच्या संधी मिळाल्या आहेत. त्यांचे योगदान विसरता येणार नाही.”

कार्यक्रमात सरपंच सौ. अनिता पवार यांनी देखील आपल्या मनोगतातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “अहिल्यादेवींनी केवळ राज्यकारभारच नाही, तर धर्म, समाजसेवा आणि न्यायप्रविष्ट कार्यातही मोठे योगदान दिले. त्यांनी गरीब, शोषित, आणि उपेक्षित घटकांसाठी काम करून खऱ्या अर्थाने जनतेची राजमाता म्हणून लौकिक मिळवला.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये एकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणाने ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य संचारले. त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे अनुकरण करणे हीच खरी काळाची गरज आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या भाषणातून उमटला. अशा कार्यक्रमांमुळे इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवले जात आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या आदर्श नेतृत्व आणि जनसेवेचा अनमोल प्रतीक आहेत. त्यांनी समाजहितासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. स्त्रीशक्ती, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचा त्यांनी दिलेला संदेश आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना आपणही समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्प करूया. अजनाळे ग्रामपंचायतीतून त्यांच्याच धर्तीवर लोकहिताचे उपक्रम राबवले जातील. अहिल्यादेवींच्या विचारांचा प्रकाश आपल्या कार्याला दिशा देतो.” 

 सरपंच सौ. अनिताताई पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नाझरे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


 
नाझरे प्रतिनिधी 

       ग्रामपंचायत नाझरे ता. सांगोला येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच अर्चना सरगर व उपसरपंच सुमित्रा लोहार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी धनगरी ओव्या व गजी ढोल तसेच मिरवणुकीचे हे आयोजन करण्यात आले होते. 


 
राजमाता अहिल्यादेवी होळकर केवळ प्रशासक नव्हत्या तर एक कुशल योद्धा व रणनीतीकार होत्या. त्यांचा स्वाभिमान आणि देशावर, मातीवर असलेली निष्ठा त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होते. शिक्षक नेते शिवभूषण ढोबळे, माणगंगा संचालक दादासो वाघमोडे, सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे, भाजपा नेते नंदकुमार रायचुरे व सामाजिक कार्यकर्ते दादासो हरिहर यांनी राजमाता यांचा जीवनपट सांगितला. तसेच राजमाता या शिवभक्त होत्या व भक्ती करावी कशी ते केवळ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून शिकावी. माता गौतम मी बाईने आपल्या सुनेश प्रजेच्या हिताकरता पदर पसरायची वेळ आलीच तर तो फक्त महादेवासमोर पसरा असे सांगितले. तसेच तत्कालीन महेश्वर व इंदोर या गावाचा कायापालट केला व महेश्वरला राजधानी बनवले व यासाठी त्यांचा इतिहास पाहण्यासाठी प्रत्येकाने महेश्वर व इंदूरला भेट देणे गरजेचे आहे असे मत पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले. तसेच स्वतःचे दागिने सोने-चांदी मोडून महादेवाची मंदिरे उभी केली व त्यांनी सोरटी सोमनाथ पासून, बद्रिकेदार पर्यंत आणि रामेश्वर पासून जगन्नाथ पुरी पर्यंत अनेक मंदिराचा कायापालट केला यावरून त्यांची भक्ती व शक्ती दिसून येते. 

    सदर प्रसंगी माजी सरपंच विजयकुमार देशमुख, हनुमंत सरगर, शामराव आप्पा वाघमारे, युवा नेते संजय सरगर, विजय सरगर, मधुकर आलदर, सागर सरगर, शशिकांत पाटील, मच्छिंद्र सरगर, दुर्योधन आलदर, राजू गड हिरे, अतुल फसाले, वासुदेव आलदर, सागर वाघमारे, पोलीस पाटील धायगुडे, मंगेश रायचुरे, विष्णू देशपांडे, संजय सरगर, संजय कोळेकर, सोसायटी व्हाईस चेअरमन राजू कोळेकर, महेश विभुते, जालिंदर सरगर, दादासो खरात, वासुदेव आलदर, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, नाना सरगर, समाधान वाघमारे, समाज बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दामोदर सरगर तर आभार शिवाजी सरगर यांनी मानले.


करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगीरी... १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त


 

विशेष प्रतिनिधी/ येताळा खरबडे

दि.२९/०५/२०२५ रोजी गोपणीयरित्या मिळालेले बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांनी केलेली कारवाई पुढील प्रमाणे

करमाळा पोलीस स्टेशन कडील पोहवा / ३७५ पांडूरंग तुकाराम आरकिले यांना गोपणीय खबर मिळाली की, मौजे जेऊर, ता. करमाळा येथे एक इसम गांजा विक्रीकरीता घेवुन येणार आहे अशी विश्वसनीय माहीती प्राप्त झाली होती. त्याबाबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. अजित पाटील, करमाळा उपविभाग करमाळा यांना कलम ४२ (१) (२) एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे प्रथम खबर अहवाल दोन प्रतिमध्ये तयार करून छापा कारवाईची परवानगीचे अधिकारपत्र प्राप्त करून घेवून छापा कारवाई करीता संपुर्ण सिल साहीत्य, शासकीय पितळी सिल, कार्बन व इलेक्ट्रॉनिक वजन काटा, लॅपटॉप, प्रिन्टर, बॅटरीसह पो.नि. रणजीत माने, सहा.पो.नि. श्री. पोपट टिळेकर, पोहवा /१५० लोहार, पोहवा / ३७५ आरकिले, पोहवा /१३६ शेख, पोहवा /१२४ ढेंबरे, पोना /१२९९ गोरे, पो. अंमलदार १६७ दहिहांडे, चापोशि/ ११९८ बारकुंड दोन पंच, वजनकाटाधारक, असे सरकारी वाहन व खाजगी वाहनाने छापा कारवाई करीता खाना झालो.

दिनांक ३०/०५/२०२५ रोजी ००:५० ते ०१:२० चे सुमारास मौजे जेऊर, ता. करमाळा येथे सापळा रचून त्यांना मिळालेले खबरीप्रमाणे एक इसम पांढऱ्या रंगाची बॅग घेवून जेऊर टेंभुर्णी बायपास रोड, जय मोटार गॅरेज जवळ जेऊर, ता. करमाळा येथे जेऊरच्या दिशने चालत जात असताना दिसला. त्याचा आम्हास मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आला. त्वरीत पोलीस पथकाचे मदतीने सदर इसमास घेराव टाकुन पो. नि. रणजीत माने यांनी त्यास त्यांची, सोबतचे पंच व पोलीस पथकाची ओळख करून देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचा परिचय दिला. सदर इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर असे सांगीतले.

नमुद इसमांची अंगझडती व त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन प्लास्टिकच्या पिशव्या मिळून आल्या व त्यात १,५०,२००/- रुपये किंमतीचा हिरव्या रंगाची पाने, फुले, काडया, बिया असलेला असा एकूण ०६ किलो ०८ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. तो पंचाच्या समक्ष पोनि श्री. रणजीत माने यांनी जप्त करून इसम नामे महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून त्याच्या विरुध्द पोहवा / ३७५ पांडूरंग आरकिले यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (पप) (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास सहा. पो.नि. श्री. पोपट टिळेकर यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी गुन्हयातील आरोपी महादेव बाबुराव फाळके यास लागलीच अटक करून मा. कोर्टात हजर केले असता, त्यास मा. न्यायालयाने दिनांक २/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि./ रणजीत माने, स.पो. नि./ पोपट टिळेकर, पोहवा /१५० लोहार, पोहवा / ३७५ आरकिले, पोहवा /१३६ शेख, पोहवा /१२४ ढेंबरे, पोना/१२९९ गोरे, पो.शि.क्र १६७/ दहिहांडे, चापो.शि.क्र ११९८ बारकुंड यांनी केली आहे.

३० मे २०२५

लिंगैक्य कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अकलूज येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन...


 नाझरे प्रतिनिधी 

           गुरु एक तोची माझा 

           विधाता अचल...

           गुरु विना सुने सारे 

            विश्व हे सकल 

             श्री गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी 30 पिठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार दिनांक दोन जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता कोळेकर महाराज खडावा दर्शन व प्रसादाचे आयोजन महादेव मंदिर अकलूज येथे केले असल्याचे वीरशैव लिंगायत समाज, शिव निर्णय संघटना व महाराष्ट्र वीरशैव सभा यांच्या वतीने केले आहे तरी समाज बांधव, शिष्य गण, बंधू, भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

२९ मे २०२५

नाझरे येथील मल्लिकार्जुन रायचुरे यांचे निधन


 

नाझरे प्रतिनिधी 

          नाझरे ता. सांगोला येथील मल्लिकार्जुन कृष्णा रायचूरे यांचे गुरुवार दिनांक 29 मे रोजी सकाळी साडेसहा वाजता वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 85 होते. 

       मा. उपसरपंच नागेश रायचूरे व शाळा व्य. स. अध्यक्ष संतोष रायचूरे यांचे ते वडील होते. मल्लिकार्जुन रायचूरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शनिवार दिनांक 31 मे रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

२८ मे २०२५

मी सध्या कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये माझं नाव जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे स्पष्टीकरण...! राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चेला दीपकआबांनी दिला पूर्णविराम..!


सांगोला / 

प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. यामध्ये माझ्या नावाची उलट सुलट चर्चा सुरू आहे मात्र,  मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे माझे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

   दरम्यान याबाबत मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची  भूमिका सध्या तटस्थ आहे. यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक काम केलेले आहे. असे ही त्यांनी सांगितले आहे. यामुळे प्रसार माध्यमातून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या चर्चेला मा. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.