माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ व शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी डोणज येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे रास्ता - रोको आंदोलन
मंगळवेढा /येताळा खरबडे
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आणि दिव्यांग बांधवांना ६००० रुपये पेन्शनसह अन्य 15 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करावा, दिव्यांग बांधवांना ६०००/- रूपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक बच्चु कडू यांनी गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहेत त्याचा भाग म्हणून राज्यातील सर्व तालुक्यात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. या आदेशानुसार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंगळवेढा येथील डोणज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.मंगळवेढा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित करण्यात आले व यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या नावे मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील, गणेश चिकमने,समाधान कोरे,शिवा स्वामी, अप्पू मिराकोर, राजकुमार चिकमने,बाबसाहेब बुध्याळकर, पवन मोरे,शिवानंद पुजारी, भोजप्पा केदार,माजी उपसरपंच रमेश केदार, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत केदार,गुरू स्वामी,संदीप आनंदपुरे, गुरुनाथ बिराजदार,सचिन जिगजेनी, हरी भाऊ इंगळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील पत्रकारांशी बोलताना असे म्हणाले की माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या अमरावती येथील मोझरी येथे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगाना 6000 महिना शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीची मजुरांकडून होणारी सर्व कामे, रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाद्वारे करण्यात यावी व अन्य 15 विविध मागण्यासाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व सध्या तरी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होऊन सातबारा कोरा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी व अस्मानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईत बुडला आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या जाहीरनाम्यात संपूर्ण कर्जमाफीची आश्वासन दिलेल्या पक्षाने सत्तेत आल्यानंतर विधानसभेत चकार शब्दही बोलत नाही त्यामुळे बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांची मार्गदर्शनाखाली डोणज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष पुढे बोलताना असे म्हणाले की माजी मंत्री तथा पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी व अन्य 15 मागण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचा सुरू आहे त्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाकडून यापुढे प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत