Breaking News

२२ डिसेंबर २०२४

देशाच्या राजधानीत घुमणार कवी प्रमोद जगताप यांची गझल


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर :- ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ तालकटोरा स्टेडिअम नवी दिल्ली येथे दि.२१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या साहित्य संमेलनात लक्षवेधी ठरणारा कवीकट्टा यामध्ये कवी प्रमोद जगताप (फलटणकर) यांना गझल सादर करण्याची संधी मिळणार आहे.

कवी प्रमोद सुनिल जगताप गोखळी ता.फलटण जि.सातारा येथील ग्रामीण भागातील कवी असून सध्या केंद्रीय अनु.जाती निवासी आश्रमशाळा पळशी ता.माण येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

वास्तवदर्शी आशयघन कविता आणि पहाडी आवाज ही त्यांची खास ओळख आहे. महाविद्यालयीन जीवनापासून NSS उपक्रमातून घडलेले प्रमोद जगताप साहित्य क्षेत्रात पहाडी आवाजामुळे शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक नवोदित कविंना मोफत गझल अध्ययन करून गझलगुरू प्रकाशदादांनी दिलेला गझलेचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि मैफील गाजवून रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची कला त्यांच्या लेखनशैलीत व आवाजात आहे. लोककवी डॉ.मदनदादा देगावकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाने घडलेले कवी जगताप यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. कवितेचं गावं जकातवाडी - फलटण तालुकाध्यक्ष आणि  काव्यफुले मराठी साहित्य व कला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून कवी जगताप साहित्य सेवा करित आहेत. त्यांच्या या दिल्ली साहित्यवारीसाठी विविधस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा