विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
लासुर्णे :- ( ता. इंदापूर ) धम्म गुरु डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार नऊदारे या ठिकाणी 26 जून लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली, यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस सौ. वर्षा पाटकुळे मॅडम यांनी पुष्पहार अर्पण केला,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सौ. आशा तोरणे मॅडम यांनी पुष्पहार अर्पण केला,
यावेळी आनंद फडतरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले ,छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती ही दिवाळी सणासारखी साजरी करण्यात यावी, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला 50 टक्के आरक्षण दिले. महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातील बॅरीस्टर पदवी घेऊन आल्यानंतर हे शाहू महाराजांना समजल्यावर छत्रपती शाहू महाराज स्वतः कोल्हापूर वरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी मुंबईला आले, व त्यांचा सत्कार करून हत्तीवरून साखर वाटली, त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले महाराज तुम्ही जर निरोप धाडला असता तर मी भेटण्यासाठी कोल्हापूरला आलो असतो.त्यावेळी शाहू महाराज म्हणाले, आम्ही परंपरेचे राजे आहोत, पण तुम्ही ज्ञानाचे राजा आहात असे उद्गार शाहू महाराजांनी काढले .
माणगाव येथे भरलेल्या परिषदेमध्ये शाहू महाराज म्हणाले की तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचे नेते आहेत, शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शाळा काढल्या व गंगाधर कांबळे नावाच्या व्यक्तीला एक हॉटेल टाकून दिले ते रोज चहा पिण्यासाठी त्या हॉटेल मध्ये जात असत, अशा दिलदार मनाच्या राजाला मानाचा मुजरा व कोटी कोटी प्रणाम असे बोलून विचार व्यक्त केले,
यावेळी प्रबुद्ध भारत युवा सामाजिक संघटनेच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले,जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा घेऊन करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा