Breaking News

२६ जून २०२३

श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त कलाशिक्षक अतुल गायकवाड यांनी कलाप्रेमी विद्यार्थ्यांना बरोबर घेवुन साकारले फलक लेखन.....


 प्रतिनिधी ‌- संतोष कदम.

वालचंदनगर :- (ता .इंदापूर ) श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी या उद्देशाने राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक अतुल गायकवाड सर यांच्या संकल्पनेतून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे फलक लेखन विद्यार्थ्यांना घेऊन तयार करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना खडू कसा धरावा , रंग संगती कशी करावी , अक्षर लेखन कसे करावे , या व अशा कितीतरी विविध कामांचे मार्गदर्शन अतुल गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांना केले व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. सध्या लुप्त होत चाललेली कला या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये जागृत होत आहे.

   त्यांच्या या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार, उपप्राचार्य अरुण निकम सर व सर्व सहकारी , कलाप्रेमी यांनी कौतुक केले आहे .  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा