Breaking News

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके हे परखड व्यासंगी विद्यापीठ - गझलकार मसूद पटेल


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

पुणे वानवडी :- 

         येथील ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित विचारांच्या पाणवठयावर  या शीर्षकाखाली निमंत्रित कवी कवयित्रीचे कविसंमेलन आयोजित केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल ,

उद्घाटक अशोक कांबळे माजी डी.वाय.एस.पी. प्रमुख पाहुणे प्रा. सूर्यकांत नामगुडे नटश्रेष्ठ कुमार आहेर  , सुधाकर फुले व्याख्याते ,

समता चळवळीचे कांतीलाल गवारे ,छगन वाकचौरे, सुप्रसिद्ध गायक सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके हे हजर होते.

यावेळी प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

सुरुवातीला भारताच्या संविधानाचे पूजन करण्यात आले असून उद्घाटक अशोक कांबळे माजी अधिकारी इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते हरी नरके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

हार ,पुष्पगुच्छ ,मेणबत्ती प्रज्वलित केली. त्यानंतर सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका गायिका कवियत्री जयश्री सोनवणे यांनी श्रद्धांजली पर गीत सादर करून कवी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

प्रास्ताविक लोककवी सीताराम नरके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी मी महात्मा फुले बोलतोय एकपात्री प्रयोग सादर करून रसिकांना वेगळी मेजवानी विचार वारस जपत समाजप्रबोधन करणारे आतापर्यंत हजारो प्रयोग त्यांनी सादर केले आहेत.

    कविसंमेलनामध्ये किशोर टिळेकर ,आनंद गायकवाड ,चंद्रकांत जोगदंड ,जनाबापू पुणेकर ,दत्तात्रय केंजळे ,रामचंद्र गुरव ,पांडुरंग म्हस्के, जयश्री सोनवणे ,अमिनिरूस्सा शहा ,दीपिका कटरे ,आशा शिंदे, गिरीश जाधव ,धर्मा शिंदे ,शामराव कांबळे ,देविदास झुंरूगे, राहुल भोसले असे यावेळी

पंचेचाळीस कवी ,कवियत्री यांनी वैचारिक मार्मिकपणे मंथन करणारी समाज प्रबोधन करत कवितेचे सादरीकरण केले.

यावेळी अध्यक्ष भाषणात मसूद पटेल म्हणाले,  ज्येष्ठ विचारवंत चळवळीचे शिलेदार प्रा. हरी नरके सर यांचे निधन ही विविध परिवर्तन वारी चळवळीला आणि ज्ञान क्षेत्राला हानी पोहचवणारी अत्यंत दुःखद घटना आहे.

धक्कादायक आणि मनाला प्रचंड वेदना  देणारी घटना घडली असून एक साहित्यिक ,अभ्यासक व साक्षेपी संपादक म्हणून त्यांनी महात्मा फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली. हरी नरके यांच्या लेखणीचा हा लहेजा जगावेगळा होताच त्यांनी बुध्दीमत्ता आणि व्यासंग जपला .

पंडिताचे प्रदर्शन न करता बौध्दिक क्षमता विकसित करण्यासाठी सत्य जगासमोर मांडताना वंचित शोषित समाजाच्या हितासाठी पूरक ठरेल असे विचार मांडत असताना

पुणे विद्यापीठला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव देण्यात प्रा. हरी नरके यांचा खारीचा वाटा होता. या महान कार्याची मंहती सर्व जणांना ज्ञात आहे. मसूद पटेल पुढे ते म्हणाले.


सूर्य प्रकाश मावळला तरी संधि प्रकाश  रेंगाळतो !

भेटीचा आस्वाद संपला तरी आठवणींचा सुंगध दरवळतो !


निसर्ग कवी पद्मश्री ना. धो .महानोर 

अजून पुरते सावरलो नाही ...

सूर्य चंद्रासारखी दिव्य माणसे सोडूनी जातात  सत्याचा उदघोष ,

हाच कलावंतांचा धर्म असतो!

  प्रमुख पाहुणे व्याख्याते सुधाकर फुले कांतीलाल गवारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . हरी नरके यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी आलेल्या सर्व साहित्यिकांचा सन्मान पत्र ,पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले .

यावेळी सर्व मान्यवरांचे सत्कार सौ .विजयाताई नरके ,लोककवी सीताराम नरके यांनी सर्वांच्या ऋणा राहू इच्छितो असे म्हणाले .

मग कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत