सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
सोमवार दि १५ जुलै रोजी आषाढी वारीचे औचित्य साधून देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन वाडी कुरवली तालुका पंढरपूर येथे दुपारी बारा वाजता झाले आणि त्याच ठिकाणी इंडस टावर्स चे सोलापूर जिल्ह्याचे एरिया ऑपरेशनल मॅनेजर श्री रामेश्वर भोसले आणि सांगोला मंगळवेढा आणि पंढरपूर विभागाचे फिल्ड सपोर्ट इंजिनियर श्री पवन कुमार मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्याची संधी मिळाली
सदर पालखीच्या सोबत लाखोंच्या संख्येने भक्तगण पायी चालत पंढरपूरकडे प्रस्थान करीत होते क्षणभर विश्रांती घेऊन हरिनामाचा जागर करत पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली
यामध्ये सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर या परिक्षेत्राची मोबाईल नेटवर्कची धुरा सांभाळणारे कर्तव्यदक्ष तंत्रज्ञ दत्तात्रय लोखंडे, यशवंत जगधने , भारत कोळेकर, दादासाहेब जगदाळे ,शंकर कदम ,सुरज जाधव ,अतुल पाटील ,समाधान धांडोरे, सुरक्षारक्षक मारुती शिंदे आणि वाडी कुरवली चे प्रतिष्ठीत नागरीक विनायक काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन अतुल पाटील यांनी पाहिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा